शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र अधिकारी गिरीश महाजन : पालघर जिल्ह्यातील ठाकरे दाम्पत्य ठरले पहिल्या दर्शनाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ठळक मुद्देपहाटे शासकीय महापूजामंदिराच्या कामास गती येणार

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तिनाथ महाराज समाधीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांत भारती, सचिव पवनकुमार भुतडा, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरूरे, पंडितराव कोल्हे, कैलास चोथे, भाजपा शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, गटनेते समीर पाटणकर, सागर उजे, विष्णू दोबाडे, दीपक गिते, भारती बदादे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, अनिता बागुल, माधवी भुजंग, शीतल उगले, मंगला आराधी, संगीता भांगरे, शिल्पा रामायणे, संत साहित्याचे अभ्यासक गुट्टे महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व श्रद्धेमुळे मंदिराचे वेगळे महत्त्व असून, मंदिराची नव्याने भव्य वास्तू उभी राहील. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्याने या काळ्या पाषाणात साकारणाºया मंदिराच्या कामास गती येणार आहे. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट कामांमुळे येथील रस्ते चांगले आहेत. तसेच भाविकांसाठी असंख्य सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील निसर्ग संपन्न डोंगररांगा, तलाव, पौराणिक ठिकाणे यांचा पर्यटन विकासासाठी देखील उपयोग होईल. कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणून ‘यूनो’ने नोंद घेतली असून, यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. ही यात्रा ‘निर्मलवारी’ होण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थांच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर व आळंदीप्रमाणेच हे स्वच्छ निर्मलवारीचे काम येथे झाले आहे, असे महाजन म्हणाले. यापूर्वी मंदिराचे पुजारी जयंत गोसावी यांनी निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीची विधिवत पंचामृत पूजाविधीचे मंत्रपठण केले. यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, भाविक उपस्थित होते.पालकमंत्र्यांकडून निर्मलवारीचे कौतुकयंदाची वारी निर्मलवारी म्हणून घोषित केली असल्याने यात्रेचे महत्त्व अधिक आहे. सुमारे २० हजारांहून अधिक कार्यकर्ते निर्मलवारी पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. त्र्यंबकेश्वर हे निसर्ग व धार्मिक महात्म्य यांचा संगम असून, येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या संधी असल्याने जागतिक पातळीवरील एक अध्यात्मिक धार्मिक केंद्र करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अगाध असल्याचे सांगून निसर्गाने या शहरावर कायमच वरदहस्त ठेवल्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शहराचा सर्वांनाच मोह पडलेला असतो. हे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्र आहे. जागतिक पातळीवर या तीर्थक्षेत्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.