शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मंदिर पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र अधिकारी गिरीश महाजन : पालघर जिल्ह्यातील ठाकरे दाम्पत्य ठरले पहिल्या दर्शनाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ठळक मुद्देपहाटे शासकीय महापूजामंदिराच्या कामास गती येणार

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तिनाथ महाराज समाधीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांत भारती, सचिव पवनकुमार भुतडा, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरूरे, पंडितराव कोल्हे, कैलास चोथे, भाजपा शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, गटनेते समीर पाटणकर, सागर उजे, विष्णू दोबाडे, दीपक गिते, भारती बदादे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, अनिता बागुल, माधवी भुजंग, शीतल उगले, मंगला आराधी, संगीता भांगरे, शिल्पा रामायणे, संत साहित्याचे अभ्यासक गुट्टे महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व श्रद्धेमुळे मंदिराचे वेगळे महत्त्व असून, मंदिराची नव्याने भव्य वास्तू उभी राहील. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्याने या काळ्या पाषाणात साकारणाºया मंदिराच्या कामास गती येणार आहे. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट कामांमुळे येथील रस्ते चांगले आहेत. तसेच भाविकांसाठी असंख्य सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील निसर्ग संपन्न डोंगररांगा, तलाव, पौराणिक ठिकाणे यांचा पर्यटन विकासासाठी देखील उपयोग होईल. कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणून ‘यूनो’ने नोंद घेतली असून, यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. ही यात्रा ‘निर्मलवारी’ होण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थांच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर व आळंदीप्रमाणेच हे स्वच्छ निर्मलवारीचे काम येथे झाले आहे, असे महाजन म्हणाले. यापूर्वी मंदिराचे पुजारी जयंत गोसावी यांनी निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीची विधिवत पंचामृत पूजाविधीचे मंत्रपठण केले. यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, भाविक उपस्थित होते.पालकमंत्र्यांकडून निर्मलवारीचे कौतुकयंदाची वारी निर्मलवारी म्हणून घोषित केली असल्याने यात्रेचे महत्त्व अधिक आहे. सुमारे २० हजारांहून अधिक कार्यकर्ते निर्मलवारी पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. त्र्यंबकेश्वर हे निसर्ग व धार्मिक महात्म्य यांचा संगम असून, येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या संधी असल्याने जागतिक पातळीवरील एक अध्यात्मिक धार्मिक केंद्र करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अगाध असल्याचे सांगून निसर्गाने या शहरावर कायमच वरदहस्त ठेवल्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शहराचा सर्वांनाच मोह पडलेला असतो. हे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्र आहे. जागतिक पातळीवर या तीर्थक्षेत्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.