शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

घोटी-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : उपाययोजनांकडे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.घोटी -सिन्नर हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणा-या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. या मार्गावर ठिकठिकाणी चढ-उतार असल्याने बाहेरच्या प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. तसेच शिर्डीला जाणाऱ्या पायी साईभक्तांच्या पालख्याही याच मार्गाने जात असल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून अनेक भविकांनाही अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने त्या खचल्या आहेत. त्यामुळेही अपघात होतात तसेच वळणाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होतात. याच आठवड्यात बेलगाव येथील एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले तर महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने अनेक अपघातात प्रवासी जखमी झाले.घोटी- सिन्नर महामार्ग हा वाहतुकीसाठी सोईचा तसेच कमी अंतर व वेळेची बचत करणारा असल्याने या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच नाशिक - सिन्नर महामार्गावर टोलनाका असल्याने शिर्डी,संगमनेर, नगर-मुंबई दरम्यान धावणारी बहुतांशी अवजड वाहने शिंदे-पळसे येथील टोल वाचविण्यासाठी घोटी- सिन्नर महामार्गाचा वापर करीत असल्यानेही वर्दळ वाढली आहे. त्यामुळेही अपघातात वाढ होत आहे.घोटी- सिन्नर शिर्डी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता चांगला जरी असला तरी अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर आजपर्यंत अनेकांना अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर दिशादर्शक फलक, वळण रस्ते, गाव, शाळा आदी मार्गदर्शक सूचनाफलक लावायला हवेत.- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी