शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

घोटी-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : उपाययोजनांकडे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.घोटी -सिन्नर हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणा-या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. या मार्गावर ठिकठिकाणी चढ-उतार असल्याने बाहेरच्या प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. तसेच शिर्डीला जाणाऱ्या पायी साईभक्तांच्या पालख्याही याच मार्गाने जात असल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून अनेक भविकांनाही अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने त्या खचल्या आहेत. त्यामुळेही अपघात होतात तसेच वळणाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होतात. याच आठवड्यात बेलगाव येथील एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले तर महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने अनेक अपघातात प्रवासी जखमी झाले.घोटी- सिन्नर महामार्ग हा वाहतुकीसाठी सोईचा तसेच कमी अंतर व वेळेची बचत करणारा असल्याने या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच नाशिक - सिन्नर महामार्गावर टोलनाका असल्याने शिर्डी,संगमनेर, नगर-मुंबई दरम्यान धावणारी बहुतांशी अवजड वाहने शिंदे-पळसे येथील टोल वाचविण्यासाठी घोटी- सिन्नर महामार्गाचा वापर करीत असल्यानेही वर्दळ वाढली आहे. त्यामुळेही अपघातात वाढ होत आहे.घोटी- सिन्नर शिर्डी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता चांगला जरी असला तरी अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर आजपर्यंत अनेकांना अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर दिशादर्शक फलक, वळण रस्ते, गाव, शाळा आदी मार्गदर्शक सूचनाफलक लावायला हवेत.- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी