शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

घोटी-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : उपाययोजनांकडे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात

घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.घोटी -सिन्नर हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणा-या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. या मार्गावर ठिकठिकाणी चढ-उतार असल्याने बाहेरच्या प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. तसेच शिर्डीला जाणाऱ्या पायी साईभक्तांच्या पालख्याही याच मार्गाने जात असल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून अनेक भविकांनाही अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने त्या खचल्या आहेत. त्यामुळेही अपघात होतात तसेच वळणाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होतात. याच आठवड्यात बेलगाव येथील एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले तर महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने अनेक अपघातात प्रवासी जखमी झाले.घोटी- सिन्नर महामार्ग हा वाहतुकीसाठी सोईचा तसेच कमी अंतर व वेळेची बचत करणारा असल्याने या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच नाशिक - सिन्नर महामार्गावर टोलनाका असल्याने शिर्डी,संगमनेर, नगर-मुंबई दरम्यान धावणारी बहुतांशी अवजड वाहने शिंदे-पळसे येथील टोल वाचविण्यासाठी घोटी- सिन्नर महामार्गाचा वापर करीत असल्यानेही वर्दळ वाढली आहे. त्यामुळेही अपघातात वाढ होत आहे.घोटी- सिन्नर शिर्डी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता चांगला जरी असला तरी अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर आजपर्यंत अनेकांना अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर दिशादर्शक फलक, वळण रस्ते, गाव, शाळा आदी मार्गदर्शक सूचनाफलक लावायला हवेत.- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी