शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:29 IST

पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल.

नाशिक : पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल. निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास करून त्याचे फायदे अनुभवावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानिकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे.चहा, कॉफीऐवजी दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्ल्यूसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात खडीसाखर, धणे, बडिशोप समप्रमाणात घ्यावे. त्यात पाणी टाकून ते झाकून ठेवावे. दुसºया दिवशी सकाळी हे पाणी तसेच किंवा गाळून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.वाढते प्रदूषण, ताणतणाव, भेसळयुक्त आहार- विहार यापासून शरीराला स्वच्छ व सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गनिर्मित आहारावर भर द्यावा. यामुळे शरीर या सर्व संकटांशी सामना करण्यास सज्ज होते. निसर्गाने आपल्या शरीरात सर्व व्यवस्था केली आहे. तहान लागणे, भूक लागणे, पोट भरणे, झोप येणे, जाग येणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आहार हे आपल्या शरीराचे इंधन आहे. त्यामुळे त्याच्या वेळा पाळून, प्रकृतीदुसार सात्विक आहार घेतल्यास तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आहाराबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान असे व्यायामप्रकारही महत्त्वाचे आहेत. - सुनंदा सखदेव, निसर्गोपचार तज्ज्ञमिश्र हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोडावेळ शरीर स्थिर झाल्यानंतर माठातले किंवा साधे पाणी प्यावे. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.