शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:29 IST

पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल.

नाशिक : पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल. निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास करून त्याचे फायदे अनुभवावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानिकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे.चहा, कॉफीऐवजी दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्ल्यूसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात खडीसाखर, धणे, बडिशोप समप्रमाणात घ्यावे. त्यात पाणी टाकून ते झाकून ठेवावे. दुसºया दिवशी सकाळी हे पाणी तसेच किंवा गाळून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.वाढते प्रदूषण, ताणतणाव, भेसळयुक्त आहार- विहार यापासून शरीराला स्वच्छ व सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गनिर्मित आहारावर भर द्यावा. यामुळे शरीर या सर्व संकटांशी सामना करण्यास सज्ज होते. निसर्गाने आपल्या शरीरात सर्व व्यवस्था केली आहे. तहान लागणे, भूक लागणे, पोट भरणे, झोप येणे, जाग येणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आहार हे आपल्या शरीराचे इंधन आहे. त्यामुळे त्याच्या वेळा पाळून, प्रकृतीदुसार सात्विक आहार घेतल्यास तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आहाराबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान असे व्यायामप्रकारही महत्त्वाचे आहेत. - सुनंदा सखदेव, निसर्गोपचार तज्ज्ञमिश्र हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोडावेळ शरीर स्थिर झाल्यानंतर माठातले किंवा साधे पाणी प्यावे. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.