शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:29 IST

पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल.

नाशिक : पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल. निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास करून त्याचे फायदे अनुभवावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानिकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे.चहा, कॉफीऐवजी दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्ल्यूसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात खडीसाखर, धणे, बडिशोप समप्रमाणात घ्यावे. त्यात पाणी टाकून ते झाकून ठेवावे. दुसºया दिवशी सकाळी हे पाणी तसेच किंवा गाळून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.वाढते प्रदूषण, ताणतणाव, भेसळयुक्त आहार- विहार यापासून शरीराला स्वच्छ व सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गनिर्मित आहारावर भर द्यावा. यामुळे शरीर या सर्व संकटांशी सामना करण्यास सज्ज होते. निसर्गाने आपल्या शरीरात सर्व व्यवस्था केली आहे. तहान लागणे, भूक लागणे, पोट भरणे, झोप येणे, जाग येणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आहार हे आपल्या शरीराचे इंधन आहे. त्यामुळे त्याच्या वेळा पाळून, प्रकृतीदुसार सात्विक आहार घेतल्यास तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आहाराबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान असे व्यायामप्रकारही महत्त्वाचे आहेत. - सुनंदा सखदेव, निसर्गोपचार तज्ज्ञमिश्र हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोडावेळ शरीर स्थिर झाल्यानंतर माठातले किंवा साधे पाणी प्यावे. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.