शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड माळरानावर बागडतात हरणे

By admin | Updated: May 4, 2016 01:05 IST

अतिचराई : चारा-पाण्याअभावी अस्तित्व धोक्यात; वन विभागाचे दुर्लक्ष

संजय दुनबळे  नाशिकसातत्याने पडणारा दुष्काळ, वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वनसंवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष, अतिचराई अशा वेगवेगळ्या कारणांमुळे येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरातील साडेसात हजार हेक्टरवरील वनक्षेत्राचे ओसाड माळरान होऊ लागले असून, चारा आणि पाणीटंचाईमुळे या परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जंगलाचे वाळवंट होऊ लागल्यानंतर आता वन विभागाला जाग आली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र राखीव करण्यात आले असून, हा भाग अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. नेहमीच दुष्काळी स्थिती असलेल्या येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरात साडेसात हजार हेक्टरवर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. मोकळ्या वातावरणात स्वछंदपणे बागडणारे हरणांचे कळप पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अनेक हौशी पर्यटक या परिसरात हरणे पाहण्यासाठी येत असतात; मात्र काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यामुळे वन परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे हरणांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.वन विभागाने वन परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये टॅँकरने पाणी टाकावे लागते. वन विभागाकडे यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे बहुतेकवेळा स्वयंसेवी संस्था आणि दानशुरांवरच टॅँकरची मदार असते. राजापूर वनक्षेत्र परिसरात वन विभागाने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाच्या अनुदानातून बोरअवेल करून त्यावर सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवून जवळच कृत्रिम पाणवठा तयार केला आहे. या बोअरवेलला थोडेफार पाणी येत असले तरी त्यावर हरणांची तहान भागण्यापेक्षा ग्रामस्थच पाण्यावर डल्ला मारत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. पिण्याच्या पाण्याबरोबर हरणांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. वन परिसरात मेंढ्या आणि गुरांची सातत्याने चराई होत असते. अनेक वर्षांपासून हे प्रकार सर्रास सुरू आहेत. सातत्याने असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस वन परिसरातील हिरवळ कमी झाली आहे. यावर्षी तर या परिसरात सरासरीपेक्षा केवळ ५ ते १० टक्केच पाऊस झाल्याने हिरवळ आलीच नाही; जी काही आली ती अल्पजीवी ठरली. विहिरींनी तळ गाठल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनीही यावर्षी उन्हाळी पिके घेतली नाहीत. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसणारा हिरवा घास यावर्षी दिसलाच नाही. यापूर्वी हरणांचा कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांवरील हिरवा चारा खाऊन गुजराण करत असत. यावर्षी मात्र त्यांच्या नशिबी तेही नसल्याने या वन परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. चाऱ्याच्या शोधात हरणांना दूरदूरवर भटकंती करावी लागत आहे. पाणी आणि चाऱ्याच्या शोधात अनेक हरणांचे आपोआपच स्थलांतर होत आहे. वन विभागाने वेळीच उपाययोजना करून हरणांचे होणारे स्थलांतर रोखणे गरजेचे आहे.