शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ओसाड माळरानावर बागडतात हरणे

By admin | Updated: May 4, 2016 01:05 IST

अतिचराई : चारा-पाण्याअभावी अस्तित्व धोक्यात; वन विभागाचे दुर्लक्ष

संजय दुनबळे  नाशिकसातत्याने पडणारा दुष्काळ, वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वनसंवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष, अतिचराई अशा वेगवेगळ्या कारणांमुळे येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरातील साडेसात हजार हेक्टरवरील वनक्षेत्राचे ओसाड माळरान होऊ लागले असून, चारा आणि पाणीटंचाईमुळे या परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जंगलाचे वाळवंट होऊ लागल्यानंतर आता वन विभागाला जाग आली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र राखीव करण्यात आले असून, हा भाग अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. नेहमीच दुष्काळी स्थिती असलेल्या येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरात साडेसात हजार हेक्टरवर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. मोकळ्या वातावरणात स्वछंदपणे बागडणारे हरणांचे कळप पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अनेक हौशी पर्यटक या परिसरात हरणे पाहण्यासाठी येत असतात; मात्र काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यामुळे वन परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे हरणांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.वन विभागाने वन परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये टॅँकरने पाणी टाकावे लागते. वन विभागाकडे यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे बहुतेकवेळा स्वयंसेवी संस्था आणि दानशुरांवरच टॅँकरची मदार असते. राजापूर वनक्षेत्र परिसरात वन विभागाने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाच्या अनुदानातून बोरअवेल करून त्यावर सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवून जवळच कृत्रिम पाणवठा तयार केला आहे. या बोअरवेलला थोडेफार पाणी येत असले तरी त्यावर हरणांची तहान भागण्यापेक्षा ग्रामस्थच पाण्यावर डल्ला मारत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. पिण्याच्या पाण्याबरोबर हरणांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. वन परिसरात मेंढ्या आणि गुरांची सातत्याने चराई होत असते. अनेक वर्षांपासून हे प्रकार सर्रास सुरू आहेत. सातत्याने असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस वन परिसरातील हिरवळ कमी झाली आहे. यावर्षी तर या परिसरात सरासरीपेक्षा केवळ ५ ते १० टक्केच पाऊस झाल्याने हिरवळ आलीच नाही; जी काही आली ती अल्पजीवी ठरली. विहिरींनी तळ गाठल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनीही यावर्षी उन्हाळी पिके घेतली नाहीत. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसणारा हिरवा घास यावर्षी दिसलाच नाही. यापूर्वी हरणांचा कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांवरील हिरवा चारा खाऊन गुजराण करत असत. यावर्षी मात्र त्यांच्या नशिबी तेही नसल्याने या वन परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. चाऱ्याच्या शोधात हरणांना दूरदूरवर भटकंती करावी लागत आहे. पाणी आणि चाऱ्याच्या शोधात अनेक हरणांचे आपोआपच स्थलांतर होत आहे. वन विभागाने वेळीच उपाययोजना करून हरणांचे होणारे स्थलांतर रोखणे गरजेचे आहे.