शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गवार १००, कारली ८० रु पये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:31 IST

उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे.

पंचवटी : उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचेबाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. पंचवटी परिसरात दैनंदिन भरणाऱ्या व आठवडे बाजारात विक्र ीसाठी येणाºया फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना १०० रु पयांची नोटदेखील कमी पडत आहे.काही दिवसांपासून उन्हाळ्याला सुरु वात झाली आहे. उन्हाच्या झळा अजून वाढायचे असल्या तरी त्याआधीच फळभाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारात मेथी ३०, तर कांदापात २५, करडई १०, शेपू २० रु पये प्रति जुडी दराने विक्र ी होत आहे. फळभाज्यांमध्ये गवार १०० रु पये, तर कारली, दोडका ८० रु पये, टमाटा ४०, ढोबळी मिरची ६० रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. फ्लावर कोबी १५ रु पये कंद प्रति दराने विक्र ी होत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दैनंदिन भाजीपाल्यात आणणाºया हिरव्या मिरचीचे बाजार भावदेखील ८० रु पये किलो असल्याने ग्राहकांना मिरचीची चव तिखटच असे म्हणावे लागत आहे.भाजीबाजारात मेथी, शेपू, पालक, कांदा पात या हिरव्या भाज्यांसह टमाटा, काकडी, कोबी, फ्लॉवर, दोडका, गिलके, गवार, हिरवी, मिरची, कारली, ढोबळी मिरची यांसह अन्य फळभाज्या विक्र ीसाठी दाखल होत आहेत.उन्हाळ्यात शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने बाजारभाव तेजीत येत असतात मात्र यंदाच्या वर्षी उन्हाळाच्या प्रारंभीपासूनच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सध्यातरी सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार