शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

विधानसभेच्या हंगामी सभापतिपदी गावित

By admin | Updated: November 5, 2014 22:40 IST

नाशिकला मिळाला पहिल्यांदाच मान

 नाशिक : मावळती विधानसभा भंग झाली असल्याने राष्ट्रपती राजवटीत विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जिवा पांडू गावित यांची निवड झाली आहे. नाशिकला हा हंगामी का होईना विधानसभा सभापतिपद मिळण्याचा मान इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याचे वृत्त आहे.यासंदर्भात सर्वात पहिले वृत्त ‘लोकमत’नेच २९ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विधिमंडळाच्या हंगामी का होईना परंतु ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा पायंडा असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वयाने व विधिमंडळ कामकाजाचा अनभुव असलेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. सभागृहातील त्यांचा सहावेळचा आमदारकीचा अनुभव पाहता हंगामी सभापती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राजशिष्टाचार विभागाने मागविली होती. त्यात गावित यांच्या निवासाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल व त्यांच्या स्वीय सहायकांची माहिती घेण्यात आली होती. (पान ७ वर)काल बुधवारी (दि. ५) त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल विद्यासागर राव यांचे पत्र प्राप्त झाले. त्यात त्यांची विधानसभेच्या हंगामी सभापतिपदी निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, येत्या १० तारखेला सकाळी १० वाजता राज्यपाल विद्यासागर राव त्यांना विधानसभा सभापतिपदाची शपथ देतील. त्यानंतर ते विधानसभा सभागृहातील सर्व आमदारांना शपथ देतील. नाशिकला जे. पी. गावित यांच्या रूपाने विधानसभेच्या हंगामी का होईना सभापतिपदी निवड होण्याचा पहिल्यांदा मान मिळाला असल्याची माहिती जि. प. गटनेते प्रशांत देवरे यांनी दिली. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच आमदार होऊनही अनामत जप्तहंगामी सभापती निवड झालेले जे. पी. गावित यांचा राजकीय प्रवास आश्चर्यकारक असून, विधानसभेत ते आतापर्यंत सहा वेळा निवडून गेले आहेत. १९७८ साली ते पहिल्यांदा माकपकडून निवडून आले. त्यानंतर ते पाच वेळा आमदार झाले. १९९५ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. १९७८ साली पहिल्यांदाच सुरगाणा मतदारसंघातून ते निवडून आले; मात्र त्यावेळी त्यांना अनामत काही वाचविता आली नाही. त्यावेळी एकूण मतदान सुमारे चाळीस हजार होते. पैकी केवळ साडेसात हजार मतदान झाले होते. एकूण ११ उमेदवार रिंगणात असताना जे. पी. गावित यांना सर्वाधिक मते मिळून ते आमदार झाले होते; मात्र एकूण मतदानाच्या १५ टक्केही मते नसल्याने त्यांची अनामत जप्त झाली होती.