शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या हंगामी सभापतिपदी गावित

By admin | Updated: November 5, 2014 22:40 IST

नाशिकला मिळाला पहिल्यांदाच मान

 नाशिक : मावळती विधानसभा भंग झाली असल्याने राष्ट्रपती राजवटीत विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जिवा पांडू गावित यांची निवड झाली आहे. नाशिकला हा हंगामी का होईना विधानसभा सभापतिपद मिळण्याचा मान इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याचे वृत्त आहे.यासंदर्भात सर्वात पहिले वृत्त ‘लोकमत’नेच २९ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विधिमंडळाच्या हंगामी का होईना परंतु ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा पायंडा असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वयाने व विधिमंडळ कामकाजाचा अनभुव असलेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. सभागृहातील त्यांचा सहावेळचा आमदारकीचा अनुभव पाहता हंगामी सभापती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राजशिष्टाचार विभागाने मागविली होती. त्यात गावित यांच्या निवासाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल व त्यांच्या स्वीय सहायकांची माहिती घेण्यात आली होती. (पान ७ वर)काल बुधवारी (दि. ५) त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल विद्यासागर राव यांचे पत्र प्राप्त झाले. त्यात त्यांची विधानसभेच्या हंगामी सभापतिपदी निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, येत्या १० तारखेला सकाळी १० वाजता राज्यपाल विद्यासागर राव त्यांना विधानसभा सभापतिपदाची शपथ देतील. त्यानंतर ते विधानसभा सभागृहातील सर्व आमदारांना शपथ देतील. नाशिकला जे. पी. गावित यांच्या रूपाने विधानसभेच्या हंगामी का होईना सभापतिपदी निवड होण्याचा पहिल्यांदा मान मिळाला असल्याची माहिती जि. प. गटनेते प्रशांत देवरे यांनी दिली. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच आमदार होऊनही अनामत जप्तहंगामी सभापती निवड झालेले जे. पी. गावित यांचा राजकीय प्रवास आश्चर्यकारक असून, विधानसभेत ते आतापर्यंत सहा वेळा निवडून गेले आहेत. १९७८ साली ते पहिल्यांदा माकपकडून निवडून आले. त्यानंतर ते पाच वेळा आमदार झाले. १९९५ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. १९७८ साली पहिल्यांदाच सुरगाणा मतदारसंघातून ते निवडून आले; मात्र त्यावेळी त्यांना अनामत काही वाचविता आली नाही. त्यावेळी एकूण मतदान सुमारे चाळीस हजार होते. पैकी केवळ साडेसात हजार मतदान झाले होते. एकूण ११ उमेदवार रिंगणात असताना जे. पी. गावित यांना सर्वाधिक मते मिळून ते आमदार झाले होते; मात्र एकूण मतदानाच्या १५ टक्केही मते नसल्याने त्यांची अनामत जप्त झाली होती.