शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

गौरव : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

मालेगावातील चार लेखकांची निवड

 मालेगाव : महाराष्ट्र राज्य शासन उर्दू साहित्य अकादमीच्या सन २०१३च्या वार्षिक पुरस्कारांसाठी येथील चौघा लेखकांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.येथील प्रख्यात लेखक व उर्दू शायर डॉ. इलियास सिद्दिकी, मुख्याध्यापक व लेखक अश्पाक उमर, ए.टी.टी. हायस्कूलचे शिक्षक डॉ. एकबाल बर्की व लेखक जाहीद अख्तर यांची या पुुरस्कारांसाठी निवड झाली आहे. डॉ. सिद्दिकी यांना त्यांच्या ‘कंदील हर्फ’ या गझल व शेरोशायरीच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘मालेगावचा इतिहास’ लिहिणारे लेखक म्हणून सिद्दिकी यांचा परिचय आहे. येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक ६४ चे मुख्याध्यापक अश्पाक उमर यांनी ‘रहनुमाई सिव्हिल सर्व्हिसेस’ हे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनसंदर्भातील पुस्तक उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांच्या या पुस्तकाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापक उमर हे पुस्तकप्रेमी असून, त्यांच्याकडे गत शंभर वर्षांतील मराठी व उर्दू भाषेतील क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध आहेत. मुख्याध्यापक उमर यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तिसरे पुरस्कारार्थी हे येथील ए.टी.टी. हायस्कूलमधील माध्यमिक शिक्षक डॉ. एकबाल बर्की हे आहेत. त्यांच्या ‘उस्ताद की नसीहत’ या बालकादंबरीची यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २००९ मध्येही बर्की यांच्या ‘मोती’ या पुस्तकासही राज्य शासनातर्फे सदर पुरस्कार देण्यात आला होता. डॉ. बर्की यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. चौथे पुरस्कारार्थी जाहिद अख्तर हे आहेत. त्यांनी गुलबुटे या मुंबईतील उर्दू बालमासिकातून उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखन केले. तसेच या मासिकातून विविध स्पर्धा परीक्षांविषयीची माहितीदेखील त्यांनी बालविद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांची सदर पुरस्कारांसाठी निवड केली आहे.