शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:43 IST

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.

ठळक मुद्दे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.ममदापूर, राजापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रहाडी ,रेंडाळा या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा बंधारा वनविभागाच्या किरकोळ कचाट्यात अडकला आहे. मेळाचा बंधारा परिसरात लघु पाठबंधारे विभागाने पूर्वी मोजणी करून तयार केलेल्या निशाण्या स्पष्ट दिसत नसल्याने वनविभागाचे किती क्षेत्र पाण्यात खाली जाते. हे स्पष्ट होत नसल्याचे मत वनविभागाचे मुख्य उपवन संरक्षक शिवबाला यांनी व्यक्त केले.सदर प्रकरण फेटाळून लावले आहे. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाकडून मेळाच्या बंधाºयासाठी आश्वासनांची खैरात करण्यात येते चार वर्षापूर्वी पालक मंत्री तथा तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सदर मेळाण्याच्या बंधार्यासाठी साडेसहा कोटी रु पया चा निधी नियोजन आयोगातून तरतूद करून मेळाच्या बंधार्यासाठी राखीव ठेवला होता .तसेच सदर कामाचे टेडर देखील काढण्यात आले होते. परंतु पुढे काही एक झाले नाही.सदर कामा ची निविदा देखील निघाली होती परंतु त्यावेळी जमीन हस्तांतरण बाकी असल्याने इतके दिवस काम रेंगाळले होते परंतु नतंर नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहेत. आता प्रश्न फक्त ममदापूर येथील मेळाचा बंधारा बाधंल्या नंतर किती जमीन पाण्याखाली जाते याचे चित्र स्पष्ट दिसत नसल्याने सदर अधिकार्यांनी तसा अहवाल दिल्याने आता या बंधाºयाच्या कामाला आणखी उशीर होणार आहे.ममदापूर येथील या बंधाºयात वन विभागाची २२ हेक्टर क्षेत्र जाणार असून क्षेत्र स्पष्ट दिसत नसल्याने लगेचच लघु पाठबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन निशाणी तयार केल्या आहेत. तसेच ममदापूर येथील हा बंधारा तयार झाल्यानंतर येथे ४० दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. त्यामुळे राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, रहाडी, देवदरी, कोळगाव, रेंडाळा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत.तरीदेखील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.वनविभागाला देखील ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयाची नितांत गरज असून याप्रकरणी वनविभागाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयासाठी त्वरीत परवानगी देऊन सहकार्य करावे असे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.(फोटो २७ बंधारा)