शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उद्याने ओस, साहित्य खरेदीचा भारी सोस

By admin | Updated: September 23, 2015 23:43 IST

देखभालीअभावी दुरवस्था : बेंचेस खरेदीसाठी निविदाप्रक्रिया

नाशिक : शहरातील बहुसंख्य उद्यानांची देखभालीअभावी विदारक स्थिती असताना त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी महापालिकेला मात्र खेळणी आणि बेंचेस खरेदीचा सोस असल्याचे दिसून येत आहे. आधी उद्याने जगवा मग उद्यानांमध्ये साहित्य बसवा, असा पवित्रा सदस्यांसह नागरिकांकडून घेतला जाऊ लागला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील विविध उद्याने तसेच खुल्या जागा व मोकळ्या परिसरात बेंचेस बसविण्यासाठी सुमारे ४१ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढल्याने विभागाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. शहरात महापालिकेची सुमारे ४७० हून अधिक उद्याने आहेत. सुमारे १५० उद्यानांची देखभाल ही महापालिकेच्या २२० कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. गेडाम यांनी २८६ उद्यानांची देखभाल खासगीकरणाच्या माध्ममातून करण्याचा प्रस्ताव महासभेवर मांडला होता. त्यासाठी ३ वर्षांचा ठेका देण्याचे प्रस्तावित करताना संबंधित मक्तेदारासाठी ६३ कलमी कठोर नियमावलीही आयुक्तांनी तयार केली होती. सदर उद्यानांची एकत्रित निविदा काढून कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्याचा आयुक्तांचा प्रयत्न होता. परंतु महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावत महिला बचत गटांना उद्यान देखभालीचे काम देण्याचा ठराव केला होता शिवाय संबंधित महिलांना मुक्त विद्यापीठामार्फत उद्यान विद्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्याचाही निर्णय झाला होता. सदरचा ठराव होऊन सहा महिने लोटले तरी प्रशासनाकडून अद्याप महिला बचत गटांकडे उद्याने सोपविण्याची कार्यवाही झालेली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण सांगत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत टोलवाटोलवीच केल्याचा आरोप सदस्यांनी केला. याशिवाय उद्यानांबाबत महासभा, स्थायी समिती तसेच प्रभाग समित्यांच्या सभांमध्येही सदस्यांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. अनेक उद्यानांची स्थिती देखभालीअभावी अतिशय गंभीर बनली असून बऱ्याचशा उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने नागरिकांना त्याठिकाणी लहान मुलांना पाठविणे धोक्याचे बनले आहे. काही उद्यानांचा ताबा तर जुगारी, मद्यपींना घेतलेला दिसून येतो. उद्याने अशी ओस पडलेली असताना त्याठिकाणी देखभाल-दुरुस्तीची कामे करण्याऐवजी महापालिकेचा उद्यान विभाग बेंचेस व खेळणी बसविण्याचा घाट घालत आहे. ज्या उद्यानांमध्ये नागरिकांना बसणे तर दूरच प्रवेश करणेही अवघड होऊन बसले आहे. तेथे बेंचेस टाकण्याचा हा उपद्व्याप कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जी उद्याने बऱ्यापैकी विकसित झालेली आहेत आणि देखभालीच्या दृष्टीने सुस्थितीत आहेत तेथे खेळणी व बेंचेस बसविण्यास हरकत नाही परंतु जी उद्याने ओस पडली आहेत तेथेही साहित्य बसविण्यासाठी खरेदीचा सोस सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)