शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कचऱ्याचा धूर ओझरकरांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:45 IST

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ गावात सर्वत्र जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहवी कायमची उपाययोजना : कुबट धुराने आरोग्य धोक्यात

सुदर्शन सारडा।लोकमत न्यूज नेटवर्कओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ गावात सर्वत्र जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाºया त्रासाचा. येथील जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदीकिनारी मारु ती वेस स्मशानभूमीच्या मागील बाजूसे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो आहे. गावातील तसेच उपनगरांतील सर्व कचरा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येते. मात्र हा प्रयोग नागरिकांच्या जिवावर उठला आहे. ओला-सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता भासत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे, तर नदीच्या पलीकडे शेती तसेच शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या साहाय्याने डम्पिंग केले जात होते. त्यावेळी प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोळ परसच आहे.या दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कचरा डेपोला लागून सार्वजनिक शौचालय आहे. कुबट दुर्गंधीचा सामना लहान मुलांपासून वयोवृद्धांनादेखील करावा लागत आहे. गावात दिवसभर दुर्गंधी पसरलेली असते. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. प्रशासनाने या समस्येवर गांभीर्याने विचार करून त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे जेणेकरून दररोज उद्भवणार्या त्रासापासून सुटका होईल.आजारांना निमंत्रण...कचरा डेपोला लागून वसाहती आहे. अनुसया पार्क, सरकार वाडा, ओम गुरु देव चाळ, तानाजी चौक, चांदणी चौक, शिवाजी रोड, मारु ती वेस, सायखेडा फाटा, राजवाडा, राणा प्रताप चौक, कोळी वाडा आदी ठिकाणच्या रहिवाशांना दुर्गंधीमुळे सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. दूषित धुरांचे लोळ अन त्यात उडणारा ठसक्यामुळे अनेकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या आहेत. हा कचरा डेपो गंभीर आजारांना निमंत्रण देणारा आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळीच या प्रश्नी नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :OzarओझरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न