शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गंगापूर रस्ता बनला धोकादायक ; वाहतुकीची प्रचंड वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:39 IST

वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

गंगापूर : वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विद्या विकास सर्कलपासून ते थेट गंगापूर गावापर्यंत रस्त्यालगत असलेले हॉटेल, लॉन्स यांच्या व्यवसायामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.गंगापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती असून, ग्राहकांची सातत्याने गर्दी असते. ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडचण होत असतानाही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असून, पार्किंगची अधिकृत जागा नसनतानाही महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्याचा अनधिकृत वापर वाढला आहे.नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे, हरसूल, तसेच गंगापूर गोवर्धनकडे सातत्याने वाहतूक सुरू असते. नेहमीच गजबजलेला गंगापूररोड हा आता अघोषित पार्किंगमुळे अधिक धोक्याचा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यवसायांबरोबर हॉटेल्स, मॉल, दारू दुकाने, लॉन्स व खाद्याच्या गाड्यांनी हा रस्ता प्रचंड गजबजलेलाअसतो.सायंकाळी सहा वाजेनंतर या मार्गाने अनेक प्रवासी दुचाकीस्वार, बसगाड्या, चारचाकी वाहने सतत धावत असतात. याच मार्गावर विविध माध्यमिक शाळा व महाविद्यालये आहेत. औद्योगिक वस्तीकडून येणाऱ्या-जाणाºया वाहतुकीमुळेही सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विद्यार्थी कामगार यांच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सततच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील आडवी उभी असलेली चारचाकी वाहने नागरिकांच्या दृष्टीने कायमच डोकेदुखी ठरली आहे. उन्हाळ्यात लॉन्समधील पंचतारांकित विवाह सोहळ्यांमुळेही हा रस्तासामान्य वाहतूकदारांसाठी अत्यंत डोकेदुखी ठरला आहे. गंगापूर रोडच्या बेशिस्त बिनधास्त पार्किंगला चाप लावणार कोण हा सवाल नागरिक व प्रवासी करीत आहेत.गंगापूररोडवर रिक्षाप्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत असताना रात्री या रस्त्याला दुतर्फा बेशिस्तपणे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे हा रास्ता अरुं द होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, अपघातांचे प्रकारही घडलेले आहेत. वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करावे लागते.- संजय परदेशी, रिक्षाचालकगंगापूररोड आधीच अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या मधोमध दुभाजक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यावसायिकांची गर्दी, वाढते हॉटेल्स, बार अ‍ॅन्ड रेस्टोरंट यांच्यामुळे नागरिकांना आपली वाहने चालवताना जीवघेणी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील पार्किंगला कुठलीही शिस्त नाही.- आबा पाटील, रहिवासी

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा