नाशिक : करारनाम्यात अट असूनही काही घंटागाडी मक्तेदारांनी ओला-सुका कचऱ्याच्या विलगीकरणाची सोयच केली नसल्याचे महापौर रंजना भानसी यांनी खतप्रकल्पाला दिलेल्या भेटीनंतर उघडकीस आले. जोपर्यंत मक्तेदारांकडूनच विलगीकरणाची नीटपणे व्यवस्था होत नाही तोपर्यंत नागरिकांकडूनही दंड आकारणी केली जाणार नसल्याचे सांगत महापौरांनी करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
घंटागाडी मक्तेदारांचे पितळ उघड
By admin | Updated: May 4, 2017 18:40 IST