शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

वीज यंत्रणेचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 2, 2015 00:04 IST

दुरुस्ती कामांची पोलखोल : विजेबरोबरच अभियंतेही गायब; ग्राहक झाले हैराण

नाशिक : देखभाल दुरुस्तीसाठी दर शनिवारी वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने इतक्या दिवसांत काय ‘दिवे’ लावले आहेत याची पोलखोल किरकोळ पावसानेच केली आहे. थोड्याशा पावसानेही संपूर्ण शहरातील वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने ग्राहकांना दोन दिवसांपासून अंधारात रहावे लागत असून, विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात तर कालपासून खंडित असलेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला, तर काही ठिकाणी वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. नेमका बिघाड कुठे आहे? वीज कधी येणार? याची कोणतीही माहिती ग्राहकांना मिळत नसल्याने विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याने महावितरणच्या या कारभाराविषयी ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शनिवारी शहर परिसरातील अनेक भागांतील फिडर्स नादुरुस्त होते, कुठे कंडक्टर बंद झाले, तर कुठे वाहिन्या तुटल्या. त्यामुळे तासंतास वीजपुरवठा गायब झालेला होता. अशा परिस्थितीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी काय करतात याची माहिती सर्वसामान्यांना मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चौकशी केली. प्रसारमाध्यमांसमोर काही अभियंते आले, मात्र शहरात कुठेही मोठा बिघाड नसल्याचा दावा त्यांनी केला व दहा तासांपेक्षा अधिक तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला. शनिवारी महात्मानगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, पाटीललेन या भागातील वीजपुरवठा खंडित असतानाही अभियंत्यांकडून इन्कार करण्यात येत होता. तसेच उंटवाडी, देवळाली कॅम्प, उपनगर, टाकळी, बिटको चौक, जैन भवन परिसर, आर्टिलरी सेंटर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जेलरोड,राजराजेश्वरी भागातही आठ तासापेक्षा अधिक काळ वीज गायब होती.