शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वीज यंत्रणेचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 2, 2015 00:04 IST

दुरुस्ती कामांची पोलखोल : विजेबरोबरच अभियंतेही गायब; ग्राहक झाले हैराण

नाशिक : देखभाल दुरुस्तीसाठी दर शनिवारी वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने इतक्या दिवसांत काय ‘दिवे’ लावले आहेत याची पोलखोल किरकोळ पावसानेच केली आहे. थोड्याशा पावसानेही संपूर्ण शहरातील वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने ग्राहकांना दोन दिवसांपासून अंधारात रहावे लागत असून, विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात तर कालपासून खंडित असलेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला, तर काही ठिकाणी वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. नेमका बिघाड कुठे आहे? वीज कधी येणार? याची कोणतीही माहिती ग्राहकांना मिळत नसल्याने विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याने महावितरणच्या या कारभाराविषयी ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शनिवारी शहर परिसरातील अनेक भागांतील फिडर्स नादुरुस्त होते, कुठे कंडक्टर बंद झाले, तर कुठे वाहिन्या तुटल्या. त्यामुळे तासंतास वीजपुरवठा गायब झालेला होता. अशा परिस्थितीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी काय करतात याची माहिती सर्वसामान्यांना मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चौकशी केली. प्रसारमाध्यमांसमोर काही अभियंते आले, मात्र शहरात कुठेही मोठा बिघाड नसल्याचा दावा त्यांनी केला व दहा तासांपेक्षा अधिक तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला. शनिवारी महात्मानगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, पाटीललेन या भागातील वीजपुरवठा खंडित असतानाही अभियंत्यांकडून इन्कार करण्यात येत होता. तसेच उंटवाडी, देवळाली कॅम्प, उपनगर, टाकळी, बिटको चौक, जैन भवन परिसर, आर्टिलरी सेंटर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जेलरोड,राजराजेश्वरी भागातही आठ तासापेक्षा अधिक काळ वीज गायब होती.