शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:29 IST

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देकुशल मनुष्यबळाची मोठी कमतरताकौशल्याधिष्ठित शिक्षणची आवश्यकता

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. जगात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर भविष्यातील आव्हाने लक्षात घेता भावी पिढीला कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. केवळ बरे, चांगले, उत्तम असून चालत नाही, तर ते सर्वोत्तम करण्यावर भर दिला पाहिजे. कारण सर्वोत्तम होण्यासाठी काम पूर्ण व यशस्वी करण्याचा ध्यास घ्यावा लागतो. हा विचार आजच्या तरूणांनी केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘झुंजा अन् झुंजत पुढे चला’ हे विवेकानंदांचे वाक्य वाचनात आल्याने आयुष्यालाच कलाटणी मिळाली, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी यावेळी ‘बीव्हीजी’ कार्यरत असलेल्या औैषधे, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांत ‘बीव्हीजी’ने पदार्पण केल्याचे सांगतानाच राज्यात लवकरच उच्च दर्जाचा फूडपार्क उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.