शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कौशल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे प्रगती शक्य युवादिनी मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गायकवाड यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:29 IST

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देकुशल मनुष्यबळाची मोठी कमतरताकौशल्याधिष्ठित शिक्षणची आवश्यकता

नाशिक : एकीकडे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे मात्र कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. भारताचे हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. जगात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर भविष्यातील आव्हाने लक्षात घेता भावी पिढीला कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. केवळ बरे, चांगले, उत्तम असून चालत नाही, तर ते सर्वोत्तम करण्यावर भर दिला पाहिजे. कारण सर्वोत्तम होण्यासाठी काम पूर्ण व यशस्वी करण्याचा ध्यास घ्यावा लागतो. हा विचार आजच्या तरूणांनी केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘झुंजा अन् झुंजत पुढे चला’ हे विवेकानंदांचे वाक्य वाचनात आल्याने आयुष्यालाच कलाटणी मिळाली, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी यावेळी ‘बीव्हीजी’ कार्यरत असलेल्या औैषधे, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांत ‘बीव्हीजी’ने पदार्पण केल्याचे सांगतानाच राज्यात लवकरच उच्च दर्जाचा फूडपार्क उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.