शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

स्वच्छ भारत अभियानाचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:39 IST

पिण्याचे पुरेसे शुद्ध पाणी व सार्वजनिक स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

नाशिक : पिण्याचे पुरेसे शुद्ध पाणी व सार्वजनिक स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.देशपातळीवर गावोगावी घरोघरी शौचालयाची निर्मिती केल्यानंतर या अभियानाचे काम डिसेंबरमध्ये संपुष्टात आले आहे. सोळा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आगामी काळातील उपक्रमाबाबत सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन आले नसल्याने स्वच्छ भारत अभियानाच्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.सोळा वर्षांपूर्वी २००३ मध्ये तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशपातळीवर संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले होते. त्यात प्रामुख्याने द्रव व घनकचºयाची विल्हेवाट लावणे, अन्नपदार्थ खाण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी, पर्यावरणीय आरोग्याचा विचार करण्यात आला होता. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादानंतर २०१२ मध्ये या अभियानाला ‘निर्मल भारत अभियान’ असे नामकरण करण्यात आले. त्यात पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, आरोग्याच्या सोयींवर अधिक भर देण्यात आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने २०१४ मध्ये या अभियानाचे ‘स्वच्छ भारत अभियान’ असे नामकरण करून प्रत्येकाच्या हातात झाडू देत गावपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून अस्वच्छतेला वेशीबाहेर टाकण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने डिसेंबर २०१९ पर्यंत उघड्यावर केल्या जाणाºया मलविसर्जनाचे उच्चाटन करणे म्हणजे त्यासाठी घरोघरी शौचालय उभारणे, आॅक्टोबर २०१९ पर्यंत ग्रामीण भागात स्वच्छतेच्या व्याप्ती वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत देशपातळीवर घरोघरी शौचालय निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबरअखेर या महत्त्वाच्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. परंतु नवीन वर्षात स्वच्छ भारत अभियानाविषयी केंद्र वा राज्य सरकारकडून ग्रामविकास यंत्रणेला कोणत्याही सूचना नाहीत. स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम व त्याचे उद्दिष्ट्ये साध्य करण्याची मुदत डिसेंबर २०१९ मध्येच संपुष्टात आली आहे. त्यापुढील उपक्रम म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन व घनकचºयाचे व्यवस्थापन राबविण्याचे ठरविले तरी त्याबाबत शासनाकडून कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने जाहीर केलेले नाहीत. परिणामी प्रत्येक जिल्ह्णात, तालुक्यात व गावपातळीवर स्वच्छ भारत अभियानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे.स्वच्छता अभियान नावापुरतेविशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात मोदी सरकारने देशपातळीवर मोठा गाजावाजा करून केली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च रस्त्यावर झाडू घेऊन उतरल्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांनी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविली होती. परंतु नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे आता सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही कमी झाले असून, महात्मा गांधी जयंती-पुण्यतिथीपुरतेच ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सीमित झाले आहे.

टॅग्स :Governmentसरकार