शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

तपासावरच निकालाचे भवितव्य अवलंबून

By admin | Updated: January 8, 2015 00:59 IST

उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

नाशिक : गुन्ह्याचा तपास पोलीस कसा आणि किती दक्षपणे करतात यावर त्या गुन्ह्याचा निकाल व आरोपीचे भवितव्य अवलंबून असते. न्यायदेवता ही समोर येणाऱ्या पुराव्यानुसार न्याय देत असते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना न्यायालयात टिकतील असे सबळ पुरावे गोळा करावे, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी दिला. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये एल. व्ही. केळकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कायदेशीर लढाई यशस्वी करण्याचे तसेच तळागाळातील लोकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास जिवंत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. समाजातून पोलीस काढले तर सगळीकडेच अराजकता माजेल. अनेक घटना या दिवसाढवळया तसेच लोकांसमोर घडतात, त्यानुसार साक्षीदार भक्कम असतात, तरीही गुन्हेगार निर्दोष सुटतात़ त्यावेळी न्यायदेवतेवरचा लोकांचा विश्वास उडतो; मात्र तसे नसून न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी असते. ती व्यक्ती नाही, तर पुरावे पाहून न्याय देत असते़ साक्षीदार जरी भक्कम असले, तरी न्यायालयासमोर सबळ पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. नागरिकांनी साक्षीदार होण्यासाठी स्वत:हून पुढे येणे, त्यांचे मनोबल वाढविणे, त्याने जबाब फिरवू नये वा फितूर होऊ नये यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे हेदेखील चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचे काम असते, असेही निकम यांनी सांगितले़ यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस व महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)