शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

तपासावरच निकालाचे भवितव्य अवलंबून

By admin | Updated: January 9, 2015 00:41 IST

उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन

नाशिक : गुन्ह्याचा तपास पोलीस कसा आणि किती दक्षपणे करतात यावर त्या गुन्ह्याचा निकाल व आरोपीचे भवितव्य अवलंबून असते. न्यायदेवता ही समोर येणाऱ्या पुराव्यानुसार न्याय देत असते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना न्यायालयात टिकतील असे सबळ पुरावे गोळा करावे, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी दिला. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये एल. व्ही. केळकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कायदेशीर लढाई यशस्वी करण्याचे तसेच तळागाळातील लोकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दलचा विश्वास जिवंत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. अनेक घटना या दिवसाढवळया तसेच लोकांसमोर घडतात, त्यानुसार साक्षीदार भक्कम असतात, तरीही गुन्हेगार निर्दोष सुटतात़ त्यावेळी न्यायदेवतेवरचा लोकांचा विश्वास उडतो; मात्र तसे नसून न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी असते. ती व्यक्ती नाही, तर पुरावे पाहून न्याय देत असते़ साक्षीदार जरी भक्कम असले, तरी न्यायालयासमोर सबळ पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. नागरिकांनी साक्षीदार होण्यासाठी स्वत:हून पुढे येणे, त्यांचे मनोबल वाढविणे, त्याने जबाब फिरवू नये वा फितूर होऊ नये यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे हेदेखील चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचे काम असते, असेही निकम यांनी सांगितले़ यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस व महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अधिकारी उपस्थित होते़(प्रतिनिधी)