शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:41 IST

ग्रामसेवकांचा संप : ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना दाखल्यांची प्रतीक्षा

ठळक मुद्देतालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ८४ ग्रामसेवक कामकाज पाहतात

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात १२४ गावांचा कारभार पाहणाऱ्या ८४ ग्रामपंचायतींचे कामकाज ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यापासून ते ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ८४ ग्रामसेवक कामकाज पाहतात. तथापि गत १५ दिवसां पासून ग्रामसेवकांचा संप सुरु असल्याने या भागातील आदिवासी ग्रामपंचायतींची विविध विकास कामे ठप्प झाली आहेत. विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मिळत नसल्यामुळे लोकांची सरकारी कामे अडली आहेत. विकास कामांसाठी आलेला निधी विशिष्ट कालावधीत खर्च होणे अपेक्षित असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागु होईल. त्यापुर्वीच कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरु होणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामपालिकांच्या एकूणच कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात प्रशासकीय सेवेत ग्रामसेवक हा महत्वाचा घटक मानला जातो. परंतु, त्यांनी पुकारलेल्या संपामुळे अडचणीत भर पडली आहे.पंचनामे कोणाच्या मदतीने करणार?ग्रामसेवकांच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील विकास खुंटला असून त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतआहे. पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान पोहोचलेल्या शेतीचे पंचनामे करण्यास ग्रामसेवकच उपलब्ध नाही तर पंचनामे कोणाच्या मदतीने करणार?- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप