शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी

By admin | Updated: August 4, 2014 00:58 IST

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी

 

 

नाशिक : कॉँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. युती सरकारच्या कारभारानंतर जनतेने लोकशाही आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आता सहाव्यांदा आघाडीचा प्रस्ताव आला तर सन्मानजनक तडजोडीसाठी कॉँग्रेस तयार आहे; परंतु कोणत्याही अटी-शर्ती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलताना केले. दरम्यान, मेळाव्यात कॉँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादीवर सडकून टीका करत स्वबळाचा नारा दिला.महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेसने पराभवाचे विश्लेषण-चिंतन केले. आता महाराष्ट्रभर विभागीय मेळावे घेतले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकले आहे. नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. राज्यात आघाडीबाबतही मते आजमावण्यात आली. त्याचा अहवाल राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्याकडे देण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत कॉँग्रेसने पाच निवडणुका लढविल्या. त्यात काही बरे-वाईट अनुभव आले; परंतु आता आघाडीचा प्रस्ताव आला तर कोणत्याही अटी-शर्तीविना सन्मानजनक तडजोडीनंतरच तो स्वीकारला जाईल, असे सांगत चव्हाण यांनी आघाडीबाबत आत्ताच काही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना चव्हाण यांनी सांगितले, लोकशाहीची परंपरा बाजूला ठेवत भाजपाने एका व्यक्तीच्या हाती पक्षाची सूत्रे दिली आहेत. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर हुकूमशाही पद्धतीने कारभार चालविला जाणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या प्रगतीचे दाखले देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे उत्पन्न उत्तर प्रदेशपेक्षाही ४० टक्के जास्त आहे. (पान ८ वर)महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र ही परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंत बनली आहे. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. गेल्या तीन वर्षांत अनेक अडचणी येऊनही महाराष्ट्र सरकारने जनतेचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या चांगल्या योजना राबविल्या. शेतकऱ्यांना १२ हजार कोटींचा निधी दिला. अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले. पुढच्या आठवड्यात एकाच दिवशी एकाच वेळी राज्यात साडेतीन हजार बंधाऱ्यांची उद्घाटने करण्यात येणार आहेत. टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीत अपप्रचारामुळे पक्षाला पराभव पाहावा लागला; परंतु आता वातावरण बदलते आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कॉँग्रेसने यश संपादन केले आहे. मोदी सरकारचा कारभार दोनच महिन्यांत जनतेला कळला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे, ही कॉँग्रेसची भूमिका आहे. परंतु कॉँग्रेसला कमी लेखले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. बारामती, कोल्हापूर, सातारा व माढा येथील विजय कुणामुळे झाले हे त्यांनी तपासून पाहावे. कॉँग्रेस एकही जागा सोडणार नाही. सन्मानजनक तडजोडीस कॉँग्रेस तयार आहे; अन्यथा २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचाही निषेध केला. दरम्यान, कॉँग्रेसची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार असून येत्या ११ आॅगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मोहनप्रकाश, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, पद्माकर वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या प्रारंभी उत्तर महाराष्ट्रातील कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करत स्वबळावर लढण्याचा नारा दिला. यावेळी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला माळीण गावातील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन शहर कॉँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष शरद अहेर यांनी केले. माजी शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी आभार मानले. व्यासपीठावर माजी मंत्री बळीराम हिरे, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार शिरीष चौधरी, आमदार जयंत ससाणे, आमदार सुधीर तांबे, आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी महापौर दशरथ पाटील, प्रदेश सचिव संजय चौपाणे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, चंद्रकांत दायमा, विजय नवल पाटील, राहुल दिवे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. इन्फोइन्फो...नाहीतर आग्यामोहोळ उठेलमाणिकराव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे कार्यकर्ते हे एक आग्यामोहोळ असून, ते उठले तर समोरच्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नाव न घेता दिला. चव्हाण- ठाकरे यांनी यावेळी सेना-मनसेवरही टीका केली. मनसेने नाशिकमध्ये काय केले, असा सवाल करत माणिकराव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना राज्य चालवायचे कसे याची काडीचीही माहिती नसल्याची टीका केली. दरम्यान, राज्यात आघाडी झाल्यानंतर कुणी नेता-पदाधिकारी वेगळी वाट चालणार असेल तर अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. इन्फोपदाधिकारी-कार्यकर्त्यांशी थेट संवादमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात येत्या विधानसभा निवडणुकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले. प्रदेश कॉँग्रेसनेही प्रत्येक गाव-तालुका पातळीवरील पदाधिकारी व प्रमुख कायकर्ते यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मागविले असून, निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री-प्रांताध्यक्ष स्वत: थेट संवाद साधून परिस्थिती जाणून घेणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.