शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

भविष्यातील संकटाची चाहूल देणारी भयावह वास्तविकता !

By किरण अग्रवाल | Updated: May 17, 2020 00:49 IST

सारांश हातावर पोट असणारा परप्रांतीय मजूर वर्ग गावाकडे निघून गेल्याने व उर्वरितही जाण्याच्या तयारीत असल्याने त्याचा म्हणून उद्योग व्यवसायावर निश्चितच परिणाम होणार आहे. कुशल कारागिरांची वानवा तर त्यामुळे जाणवेलच, शिवाय मजुरी वाढीलाही स्वीकारावे लागेल. त्यामुळे जे थांबून आहेत त्यांची काळजी घेणे अपरिहार्य बनले आहे.

ठळक मुद्देमजुरांअभावी नाशकातील स्मार्ट सिटीची कामे ‘स्लो डाउन’कंपन्या सुरू करायच्या आहेत, पण कामगारांची वानवागड्या आपुला गाव बरा, म्हणत बहुतेकांनी परतीचा मार्ग धरला

किरण अग्रवाल।संकट कोणतेही असो, त्याला दिशेच्या मर्यादा नसतात. ते चहुदिशांनी येत असते असे म्हणतात. कोरोनाचेही तसेच झाले आहे. वर्तमानात तर त्यासाठी सारेच लढत आहेत, पण भविष्यातही त्यामुळे किती व कशा अडचणी वाढून ठेवल्या आहेत, त्याची चुणूक आतापासूनच दिसून येऊ लागली आहे. नाशिक महापालिकेअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे मजुरांअभावी रेंगाळल्याच्या बाबीकडे त्याचदृष्टीने व प्रातिनिधिक म्हणून पाहता यावे.

कोरोनाच्या संकटकाळात परप्रांतीय, स्थलांतरित मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. लॉकडाउनमुळे कामधंदे बंद झाले, त्यातून संबंधितांचा रोजगार हिरावला गेलाच, शिवाय एकाच १० बाय १० च्या रूममध्ये राहायचे तरी किती जणांनी, म्हणून त्यातही अडचणी आल्या. परिणामी गड्या आपुला गाव बरा, म्हणत बहुतेकांनी परतीचा मार्ग धरला. बरे, लॉकडाउन-१, नंतर २ व पुढेही त्याचेचे ‘रिटेक’ सुरू झाले म्हटल्यावर परप्रांतीय मजुरांचा धीर सुटला; आहे तिथे हाल सहन करण्यापेक्षा गावाकडे गेलेले बरे म्हणत अगदी पायी चालत जाण्याचा धोका स्वीकारत काही जण बाहेर पडले. त्यातून निर्माण होऊ पाहणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न व गर्दीतून होऊ शकणारा संसर्ग पाहता शासनानेच अखेर खास रेल्वे व बसेसद्वारा संबंधितांच्या घरवापसीची व्यवस्था केली. रोजी-रोटीसाठी इकडे आलेल्या या बांधवांची घरची ओढ, मनात असलेली भीती व आणखी किती दिवस चालेल हे असे, याबाबतची अनिश्चितता; यातून हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आले खरे, परंतु तेच आता भविष्यातील कामकाज-उद्योग पूर्व पदावर येण्याच्या दृष्टीने कसे अडचणीचे ठरून गेले आहे, याची प्रचिती येऊ लागली आहे. यातून उद्याचे संकट कसे तीव्र होऊ शकणारे आहे, ते मनुष्यबळाची चणचण जाणवण्यापासून तर महागाई वाढविण्यापर्यंत कसे परिणामकारक ठरू शकेल याचा अंदाज बांधता यावा.

नाशिकमधून विशेष ४ रेल्वेद्वारे तर सुमारे सातशेपेक्षा अधिक बसेसद्वारे २० हजारांहून अधिक परप्रांतीयांची आपापल्या गावाकडे पाठवणी झाली आहे. खासगी वाहने व अन्य मार्गाने नाशिक सोडलेल्यांची संख्या वेगळी. त्यामुळे स्वाभाविकच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कामकाजी मनुष्यबळ लगेच उपलब्ध होणे व पूर्वीच्याच क्षमतेने उद्योगधंदे सुरू होणे केवळ अशक्य आहे. नाशकातील बांधकाम उद्योग व्यवसायात सुमारे ७० टक्के मजूर उत्तर प्रदेश व बिहारमधील असल्याचे सांगितले जाते. हॉटेल व्यवसायात राजस्थानमधील तर सुवर्ण कारागिरीत प. बंगालचे बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. अन्यही मोलमजुरीच्या कामात परप्रांतीय असून, कोरोनामुळे ते परागंदा आहेत. बहुसंख्य लोक गेलेले असल्याने कामावरील ताण जाणवणार आहे. यातील उद्योगांना बाधित करणारी बाब अशी की, या परप्रांतीयांमध्येच त्या-त्या क्षेत्रातील कुशल कारागीर आहेत. हॉटेलमधील ‘कुक’ असोत, की बांधकाम क्षेत्रातील आरसीसी सेन्ट्रिंग वा टाइल्स फिटिंगचे काम करणारे; त्यांच्यावर अनेक संबंधित अवलंबून आहेत. पण, ते कारागीरच निघून गेल्याने नवा शोधणे व त्याच्या जास्तीच्या अपेक्षा पूर्ण करणे जिकिरीचे ठरणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, रोजगार पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसल्याने परप्रांतीय गेले आहेत व आता वाहने उपलब्ध होऊ लागल्याने उरलेलेही जाण्याच्या मानसिकतेत आहेत. तेव्हा सरकारने व स्थायिक प्रशासनानेही याबाबत विचारपूर्वक निर्णय घेण्याची व राहिलेल्यांना आश्वस्त करण्याची गरज आहे. जाऊ पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रसंगी पदरचे खर्चून त्यांची व्यवस्था करावी लागली, तरी गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहावे लागेल. अन्यथा, अनेक व्यवसायात मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ येईल. अटी-शर्तींना बांधील राहून उद्योग सुरू करायला परवानगी तर दिली, पण काम करायला मजूर आहेत कुठे? नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीची कामे त्यामुळेच तर ‘स्लो डाउन’ झाली आहेत आणि आता पावसाळापूर्व जी कामे करायची आहेत; मग ती नालेसफाईची असोत की रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणांची, त्यांचे काय हा प्रश्न आहेच.

चिंतेची बाब अशी की, गावी दूरवर गेलेले हे कारागीर लगेच परततील या भ्रमात राहता येऊ नये. एकतर कोरोनाचे संकट लवकर आटोक्यात येणारे नाही, व चलनवलन सुरू झाले तरी सर्वांनाच त्यांचा रोजगार मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे किमान दिवाळी आटोपूनच ते परततील असे दिसते. तोपर्यंतचा त्यांचा बॅकलॉग कसा भरून काढणार? यात कामांचा खोळंबा तर होईलच, शिवाय पर्यायी मजुरांकडून होणारी मजुरीतील वाढ स्वीकारणे भाग ठरेल. म्हणजे सामान्यांच्या लेखी महागाईत भर. तेव्हा स्थलांतरितांचे लोंढे समाधानाच्या भावाने त्यांच्या गावी पाठविले गेले, ते यापुढील काळात अडचणीला निमंत्रण देणारेच ठरण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस