शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:13 IST

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा उद्योगांवर परिणाम

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील श्री समर्थ औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र फीडर टाकणार असल्याचे वर्षांपासून आश्वासन देत आहे, मात्र अजूनही त्याची पूर्ती नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजक एकत्रपणे महावितरण विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी दिली. पिंपळगावच्या औद्योगिक क्षेत्रात स्टील रोलिंग मिल, प्लॅस्टिक मोल्डिंग उद्योग, फूड इंडस्ट्री, फार्मसिटिकल आदी सातत्याने प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात असून व या उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.महावितरणने मागील काही दिवसांपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा दावा केला, मात्र सध्या वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. तसेच, ट्रान्सफॉर्मर बसवणे किंवा तांत्रिक कारण अथवा नैसर्गिकरीत्या होणाऱ्या ४८ तासांच्या शटडाऊनलाही औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नेहमी सहकार्य करतात.मात्र नुकसान टाळण्यासाठी नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली जाते, तेव्हा महावितरण कंपनी सहकार्य करत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजकांना त्याचा फटका बसत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी पिंपळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक महावितरण कंपनीवर धडक मोर्चा नेणार असल्याचे समर्थ औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी सांगितले.औद्योगिक वसाहतीला स्वतःचा फीडर हवा आहे. कारण पिंपळगाव सबस्टेशनमधील फीडर पिंपळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सतत ओव्हर लोडिंग होऊन फीडर ट्रिप होतो. यासाठी महावितरणने पिंपळगाव औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र फीडर देऊन औद्योगिक ग्राहकांची मुख्य अडचण दूर करावी.- सुधाकर कापडी, संचालक, पिंपळगाव बसवंत, एमआयडीसीपिंपळगाव औद्योगिक वसाहतीमधून महावितरण कंपनीला कोट्यवधींची वसुली होत असते. तरीही महावितरण कंपनी सुरळीतपणे वीजपुरवठा देत नाही. प्रत्येकी दोन तासाला वीजपुरवठा खंडित करते, त्यामुळे उद्योजकांचे लाखो रुपयांचे दररोज नुकसान होत आहे. कंपनीने वेळेत वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उद्योजक रस्त्यावर उतरतील.- अरुण काळे, व्यवस्थापक, औद्योगिक वसाहत, पिंपळगाव बसवंतवेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने समर्थ औद्योगिक वसाहतीत सुरळीतपणे वीजपुरवठा केला नाही तर नाइलाजाने आम्हाला युनिट बंद करावे लागेल. परिणामी वसाहतीतील प्रगती खंडित होईल त्यामुळे योग्य दखल घ्यावी.- रमेश बोरस्ते, संचालक, बोरस्ते ॲग्रो.

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज