शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

‘सर्वसामान्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:59 IST

आपल्या देशामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. समाजातील अनेक घटकांचा आवाज दाबला जात आहे. मग बळीराजा असो किंवा कष्टकरी कामगार; मात्र माध्यमांकडून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाताना दिसत नाही. काही मोजक्याच लोकांच्या हातांमध्ये माध्यमे

नाशिक : आपल्या देशामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. समाजातील अनेक घटकांचा आवाज दाबला जात आहे. मग बळीराजा असो किंवा कष्टकरी कामगार; मात्र माध्यमांकडून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाताना दिसत नाही. काही मोजक्याच लोकांच्या हातांमध्ये माध्यमेगेली असल्याची खंत प्रसिद्ध माहितीपट निर्माते अंजली मोंटेरो, के.पी. जयशंकर यांनी बोलून दाखविली.निमित्त होते, अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिकच्या वतीने ७व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे. गुरुवारी (दि.२०) कुसुमाग्रज स्मारकात आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिव्यक्ती संस्थेचे अनुराग केंगे, रघुनाथ फडणीस, महेश जगताप उपस्थित होते.यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर बोलताना मोंटेंरो व जयशंकर यांनी माध्यमे सत्यस्थितीचे वार्तांकन काही अपवाद वगळता करत नसल्याचे सांगितले. अशावेळी महितीपट, लघुुपटांच्या माध्यमातून अनेक सामाजिक आशय असलेले विषय समाजापर्यंत दर्जेदारपणे पोहोचविता येतात. त्यासाठी अशाप्रकारच्या फेस्टिव्हलची गरज असते.मागील सहा वर्षांपासून नाशिकमध्ये आयोजित केले जाणारे ‘अंकुर’ हे उत्तम व्यासपीठ असल्याचे ते म्हणााले.यावेळी मोंटेरो यांनी ‘अ डेलिकेट विव’ या माहितीपटाबद्दल माहिती दिली. कच्छ येथे तीन फिल्म बनवल्या आहेत. दरम्यान, माहितीपट व फेस्टिव्हलची सिग्नेचर फिल्म दाखवण्यात आली. काजल बोरस्ते हिने प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक