शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा ...

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असणारे अनेक बाधित तसेच काहींचे कुटुंबीयदेखील कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे मुक्त संचार करीत असतात. गृहविलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष नगण्य असल्याने जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहविलगीकरणातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे चिंतेचा विषय ठरू लागले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांकडून गृहविलगीकरणालाच प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेण्याची मुभादेखील रुग्णांना आहे. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात. मात्र, हे करताना गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा असूनही थोडे बरे वाटल्यानंतर अवघ्या तिसऱ्या, चौथ्या दिवशीदेखील ते मुक्तपणे संचार करू लागतात. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच अन्य नागरिक बाधित होण्याचा संभव अधिक आहे.

-------------

इन्फो

गृह विलगीकरणातील फरक

सुरुवातीच्या काळात विलगीकरणात ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दररोज अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे स्टीकर्स आणि कागदावर माहिती टाकून ते दर्शनी भागात लावले जात होते; मात्र, आता त्याऐवजी थेट सोसायटीवरच कापडी फलक लावले जात असल्याने मोठ्या सोसायटीत नक्की कोण बाधित आणि किती बाधित आहे, ते समजत नाहीत. आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने यंत्रणादेखील अपुरी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------

इन्फो

८५ टक्के नागरिकांचे घरीच उपचार

बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ८० टक्क्यांहून अधिक बाधित निवडत आहेत. मात्र, या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार बरा झाल्याच्या भ्रमात आठवड्याच्या आतच बाहेर फिरण्यास प्रारंभ करीत असल्याने इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत.

------------

(हा रिॲलिटी चेक आहे. राजू फोटो देणार आहेत.)