शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा ...

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असणारे अनेक बाधित तसेच काहींचे कुटुंबीयदेखील कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे मुक्त संचार करीत असतात. गृहविलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष नगण्य असल्याने जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहविलगीकरणातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे चिंतेचा विषय ठरू लागले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांकडून गृहविलगीकरणालाच प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेण्याची मुभादेखील रुग्णांना आहे. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात. मात्र, हे करताना गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा असूनही थोडे बरे वाटल्यानंतर अवघ्या तिसऱ्या, चौथ्या दिवशीदेखील ते मुक्तपणे संचार करू लागतात. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच अन्य नागरिक बाधित होण्याचा संभव अधिक आहे.

-------------

इन्फो

गृह विलगीकरणातील फरक

सुरुवातीच्या काळात विलगीकरणात ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दररोज अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे स्टीकर्स आणि कागदावर माहिती टाकून ते दर्शनी भागात लावले जात होते; मात्र, आता त्याऐवजी थेट सोसायटीवरच कापडी फलक लावले जात असल्याने मोठ्या सोसायटीत नक्की कोण बाधित आणि किती बाधित आहे, ते समजत नाहीत. आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने यंत्रणादेखील अपुरी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------

इन्फो

८५ टक्के नागरिकांचे घरीच उपचार

बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ८० टक्क्यांहून अधिक बाधित निवडत आहेत. मात्र, या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार बरा झाल्याच्या भ्रमात आठवड्याच्या आतच बाहेर फिरण्यास प्रारंभ करीत असल्याने इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत.

------------

(हा रिॲलिटी चेक आहे. राजू फोटो देणार आहेत.)