शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा ...

नाशिक : कोरोनाने आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व आकडे मोडीत काढले असतानाही अनेक नागरिकांमधील बेफिकिरी कायम आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असणारे अनेक बाधित तसेच काहींचे कुटुंबीयदेखील कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे मुक्त संचार करीत असतात. गृहविलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष नगण्य असल्याने जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहविलगीकरणातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे चिंतेचा विषय ठरू लागले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांकडून गृहविलगीकरणालाच प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेण्याची मुभादेखील रुग्णांना आहे. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात. मात्र, हे करताना गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा असूनही थोडे बरे वाटल्यानंतर अवघ्या तिसऱ्या, चौथ्या दिवशीदेखील ते मुक्तपणे संचार करू लागतात. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच अन्य नागरिक बाधित होण्याचा संभव अधिक आहे.

-------------

इन्फो

गृह विलगीकरणातील फरक

सुरुवातीच्या काळात विलगीकरणात ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दररोज अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे स्टीकर्स आणि कागदावर माहिती टाकून ते दर्शनी भागात लावले जात होते; मात्र, आता त्याऐवजी थेट सोसायटीवरच कापडी फलक लावले जात असल्याने मोठ्या सोसायटीत नक्की कोण बाधित आणि किती बाधित आहे, ते समजत नाहीत. आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने यंत्रणादेखील अपुरी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------

इन्फो

८५ टक्के नागरिकांचे घरीच उपचार

बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ८० टक्क्यांहून अधिक बाधित निवडत आहेत. मात्र, या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार बरा झाल्याच्या भ्रमात आठवड्याच्या आतच बाहेर फिरण्यास प्रारंभ करीत असल्याने इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत.

------------

(हा रिॲलिटी चेक आहे. राजू फोटो देणार आहेत.)