शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:42 IST

नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून देणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ अद्यापही कायम असून, सन २०१७-१८ वर्षासाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन शिष्यवृत्तीचे प्रकरणे दाखल करणाºया विद्यार्थ्यांच्या अर्जावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुमारे ४,१३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण : महाविद्यालयांकहून ई-स्टेटमेंट नसल्याने अर्ज निर्णयाविना पडून

नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून देणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ अद्यापही कायम असून, सन २०१७-१८ वर्षासाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन शिष्यवृत्तीचे प्रकरणे दाखल करणाºया विद्यार्थ्यांच्या अर्जावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुमारे ४,१३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती मिळण्यासाठीचा अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या समावेश असतो. यासाठी समाजकल्याण विभागाकडे अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील २०१७-१८ साठीचे आॅनलाइन आणि आॅफलाइन असे सुमारे ६८,२४६ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर आत्तापर्यंत ६३ हजार १५२ अर्ज निकाली काढण्यात आले आहे असे असलेतरी अजूनही ५,०९४ अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.आॅनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या ३६,७२२ इतकी असून, ३२ हजार ५९२ अर्ज आजवर निकाली काढण्यात आलेले आहेत. अद्यापही ४१३० विद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णय होऊ शकलेला नाही. संबंधित महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांचे ई-स्टेटमेंट समजाकल्याण विभागाला सादर करणे अपेक्षित आहे. मात्र महविद्यालयांनी अशाप्रकारचे ई-स्टेटमेंट अजूनही सादर केले नसल्यामुळे आॅनलाइन त्रुटी निर्माण झाली आहे, तर आॅफलाइन पद्धतीने ३१,५२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ३० हजार ५६० अर्ज निकाल काढण्यात आलेले आहेत, तर उर्वरित ९५४ अर्ज अद्यापही प्रलंबित आहे.समाजकल्याण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसतानाही कामांचा निपटारा करण्यास काहीसा वेळ होत असला तरी महाविद्यलयांच्या दिरंगाईचा फटकादेखील समाजकल्याणच्या कारभारावर येत असल्याने समाजकल्याणला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. आॅनलाइन दाखल अर्जाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त दिसत असली तरी महाविद्यालयांकडून पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे या प्रकरणांबाबत निर्णय घेता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.आॅनलाइन अर्जाचा गोंधळआॅनलाइन अर्ज दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जासाठी संबंधित महाविद्यालयाचे ई-स्टेटमेंट अपेक्षित असते. मात्र जुलै महिना उजाडूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ई-स्टेटमेंट सादर न केल्यामुळे अशा सुमारे ४,१३० मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी समाजल्याण शिष्यवृत्ती विभागाकडून सुरू आहे. यामध्ये ४,१३० अर्ज महाविद्यालयांच्या चुकीमुळे निर्णयाविना पडून असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी अडचण सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाEducationशिक्षण