शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:41 IST

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यामध्ये दुसºयांदा पिके वाया जाणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. पेठ तालुका वगळता १६२१ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत.आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सात तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालावरून या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील १५० गावे बाधित झाली आहेत, तर बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ८१,१६९ इतकी आहे.सटाणा तालुक्यातील २३५ गावांमधील ५४,२१२, नांदगाव तालुक्यात १०० गावांतील ३७,५१३, कळवणमधील १५० गावांतून ३०,२४१, दिंडोरीतील १०५ गावांमधून ८,२४०, देवळा येथील ४६ गावे बाधित झाली आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २६,५८९ इतकी आहे. सुरगाणा येथील ६ गावांमधील ४६ शेतकरी, नाशिक तालुक्यातील ७७ गावांमधील अंदाजे ५ हजार शेतकरी, इगतपुरीतील १२७ गावांमधून १५४१, त्र्यंबकेश्वरला बाधित झालेल्या १२५ गावांमधील १३,५७०, निफाड १३६ गावांमधील ६२,६८५, चांदवड तालुक्यातील ११२ गावांमधील ५८,५६१, येवला येथील १२४ गावांमधून २९,२३४ तर सिन्नरमधील १२८ गावांतील ४८,३३० शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ५६ हजार ९३१ इतकी असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.क्यार वादळामुळे महाराष्टÑात आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने बदललेल्या वातावरणाचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.आॅक्टोबरमध्ये पाऊस परतीला लागत असल्यामुळे त्यादृष्टीने शेतकºयांकडून पिकांचे नियोजन केले जाते; परंतु लहरी वातावरणामुळे शेतकºयांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडलेआणि आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे तर शेतकºयांचे कंबरडे मोडलेआहे.शेतातील पिकांचे नुकसान झालेच शिवाय काढणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा, ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन, २.२५ लाख हेक्टरवरील मका, तसेच काही हजार हेक्टरवर बाजरी पीक घेण्यात आले आहे. या पिकांसह भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूर