शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:41 IST

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यामध्ये दुसºयांदा पिके वाया जाणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. पेठ तालुका वगळता १६२१ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत.आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सात तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालावरून या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील १५० गावे बाधित झाली आहेत, तर बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ८१,१६९ इतकी आहे.सटाणा तालुक्यातील २३५ गावांमधील ५४,२१२, नांदगाव तालुक्यात १०० गावांतील ३७,५१३, कळवणमधील १५० गावांतून ३०,२४१, दिंडोरीतील १०५ गावांमधून ८,२४०, देवळा येथील ४६ गावे बाधित झाली आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २६,५८९ इतकी आहे. सुरगाणा येथील ६ गावांमधील ४६ शेतकरी, नाशिक तालुक्यातील ७७ गावांमधील अंदाजे ५ हजार शेतकरी, इगतपुरीतील १२७ गावांमधून १५४१, त्र्यंबकेश्वरला बाधित झालेल्या १२५ गावांमधील १३,५७०, निफाड १३६ गावांमधील ६२,६८५, चांदवड तालुक्यातील ११२ गावांमधील ५८,५६१, येवला येथील १२४ गावांमधून २९,२३४ तर सिन्नरमधील १२८ गावांतील ४८,३३० शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ५६ हजार ९३१ इतकी असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.क्यार वादळामुळे महाराष्टÑात आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने बदललेल्या वातावरणाचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.आॅक्टोबरमध्ये पाऊस परतीला लागत असल्यामुळे त्यादृष्टीने शेतकºयांकडून पिकांचे नियोजन केले जाते; परंतु लहरी वातावरणामुळे शेतकºयांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडलेआणि आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे तर शेतकºयांचे कंबरडे मोडलेआहे.शेतातील पिकांचे नुकसान झालेच शिवाय काढणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा, ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन, २.२५ लाख हेक्टरवरील मका, तसेच काही हजार हेक्टरवर बाजरी पीक घेण्यात आले आहे. या पिकांसह भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूर