शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:41 IST

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यामध्ये दुसºयांदा पिके वाया जाणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. पेठ तालुका वगळता १६२१ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत.आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सात तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालावरून या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील १५० गावे बाधित झाली आहेत, तर बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ८१,१६९ इतकी आहे.सटाणा तालुक्यातील २३५ गावांमधील ५४,२१२, नांदगाव तालुक्यात १०० गावांतील ३७,५१३, कळवणमधील १५० गावांतून ३०,२४१, दिंडोरीतील १०५ गावांमधून ८,२४०, देवळा येथील ४६ गावे बाधित झाली आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २६,५८९ इतकी आहे. सुरगाणा येथील ६ गावांमधील ४६ शेतकरी, नाशिक तालुक्यातील ७७ गावांमधील अंदाजे ५ हजार शेतकरी, इगतपुरीतील १२७ गावांमधून १५४१, त्र्यंबकेश्वरला बाधित झालेल्या १२५ गावांमधील १३,५७०, निफाड १३६ गावांमधील ६२,६८५, चांदवड तालुक्यातील ११२ गावांमधील ५८,५६१, येवला येथील १२४ गावांमधून २९,२३४ तर सिन्नरमधील १२८ गावांतील ४८,३३० शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ५६ हजार ९३१ इतकी असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.क्यार वादळामुळे महाराष्टÑात आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने बदललेल्या वातावरणाचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.आॅक्टोबरमध्ये पाऊस परतीला लागत असल्यामुळे त्यादृष्टीने शेतकºयांकडून पिकांचे नियोजन केले जाते; परंतु लहरी वातावरणामुळे शेतकºयांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडलेआणि आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे तर शेतकºयांचे कंबरडे मोडलेआहे.शेतातील पिकांचे नुकसान झालेच शिवाय काढणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा, ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन, २.२५ लाख हेक्टरवरील मका, तसेच काही हजार हेक्टरवर बाजरी पीक घेण्यात आले आहे. या पिकांसह भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूर