शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नांदगाव नगरपरिषदेवर तीन वर्षात चार मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST

नांदगाव : ऐशींच्या दशकात दर तीन महिन्यांनी बदलणारा नगराध्यक्ष यामुळे नांदगाव नगरपरिषद महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. तोच काळ आता ...

नांदगाव : ऐशींच्या दशकात दर तीन महिन्यांनी बदलणारा नगराध्यक्ष यामुळे नांदगाव नगरपरिषद महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. तोच काळ आता कोरोना काळात नांदगावकर अनुभवत असून तीन वर्षांत चार मुख्याधिकारी बदलले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाची घडी बसणे अवघड होऊन बसले आहे.

ऐशीच्या दशकात बहुमत अनेक तुकड्यामध्ये विभागले गेल्याने सत्तेच्या राजकारणात विकासाचा बट्ट्याबोळ झाला होता. संवर्गातले मुख्याधिकारी राजकीय अराजकतेमुळे येथे यायला तयार नव्हते. त्यामुळे महसूल विभागातल्या अव्वल कारकुनापासून नायब तहसीलदार व कधी कधी तहसीलदार यांचेकडे मुख्याधिकारीपद यायचे. महसूल विभागात मुख्याधिकारी पदापासून दूर पळण्याची स्पर्धा असायची. मुख्याधिकारी पदावर बसलेला मुख्याधिकारी राजकीय दबावामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकाराचा बळी होतो असा समज झाल्याने कोणीही पद स्वीकारायला तयार होत नसत.

तो काळ पुन्हा: आला की काय, अशी शंका यावी इतक्या पटापट मुख्याधिकारी येथून बदलून जात आहेत. आजच्या काळात पूर्वीसारखी परिस्थिती नाही. राजकीय स्थिरता आहे. नगराध्यक्ष आपला काळ पूर्ण करत आहेत. कोणत्याही प्रकारची राजकीय रस्सीखेच नाही. तरीही कोरोना काळात नांदगाव नगरपरिषदेचे तीन मुख्याधिकारी कार्यकाळ पूर्ण न करता बदलून गेल्याने राजकीय वर्तुळात व सामान्यातही चर्चा रंगली आहे. बदलीचा आदेश काढणे व तो पुन्हा रद्द करून पुन्हा काढणे एवढे सोपे झाले आहे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

इन्फो

तीन वर्षांचा कालावधी

मुख्याधिकारी पदाचा कार्यकाळा हा तीन वर्षांसाठी असतो. तीन वर्षे सलग राहिल्याने मुख्याधिकाऱ्याची प्रशासनावर पकड बसून त्याला कामकाजात सुसूत्रता आणणे सोपे जाते. त्यामुळे तीन वर्षे तरी कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय बदल्या होत नाहीत. वादग्रस्त असेल तरच त्या ठिकाणी बदलीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु, नांदगावी कसलीही वादाची पार्श्वभूमी अथवा वादाचे प्रसंग नसताना मुख्याधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या चर्चेचा विषय बनला आहे.

इन्फो

मुख्याधिकारी पदाचा कार्यकाळ

मुख्याधिकारी महिने

वसुधा कुरणावळ/देवचके - २४.९ महिने

पंकज गोसावी - ९.२ महिने

निर्मला गायकवाड- १.९ महिने

विवेक धांडे - १ जुलै २०२१ पासून