शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सभापतींविरुद्ध भाजपाच्या चार सदस्यांचे बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेणाºया शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत सत्ताधारी भाजपाच्या चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध बंड पुकारले आहे. स्थायीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्थायी समितीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक : महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेणाºया शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत सत्ताधारी भाजपाच्या चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध बंड पुकारले आहे. स्थायीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्थायी समितीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सभापतींनी त्याची दखल न घेतल्याने विरोधकांनी गोंधळ घातला होता. याशिवाय, काही प्रस्तावांनाही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, त्यालाही सभापतींनी दाद न दिल्याने शिवसेना, राष्टÑवादी व अपक्ष सदस्यांनी सभात्याग केला होता. मंगळवारी (दि.२६) स्थायी समितीतील शिवसेनेचे सदस्य सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, अपक्ष मुशिर सय्यद, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासह भाजपाचे मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांनी आपल्या स्वाक्षºयांचे पत्र नगरसचिवांना देत काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला. पत्रात आक्षेप घेताना म्हटले आहे, सभा क्रमांक १४ मध्ये नियमित बैठकीत नसलेले जादा विषय नंतर टाकण्यात आले आहेत. तसेच अनेक आक्षेपार्ह विद्युत विभागाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सभा क्रमांक ७, १५, १७ आणि १८ ची इतिवृत्ते मंजूर करू नये. भूसंपादनाचेही विषय बहुमताने फेटाळण्यात आले आहेत. ग्रीन जीमच्या संदर्भातही प्रशासनाच्या भूमिकेत सुस्पष्टता नाही, बिटको रुग्णालयातील विद्युत साधनांच्या खरेदीबाबतचाही विषय तहकूब ठेवण्यात आलेला आहे. डिझायनरच्या फी संदर्भात रक्कम नमूद नाही आणि नियुक्तीचा कालावधीदेखील जास्त आहे. त्यामुळे महापालिकेच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याच आशयाचे पत्र दहा सदस्यांनी सभापतींनाही दिले आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या चार सदस्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळविल्याने स्थायीत भाजपांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. सत्ताधारी भाजपातील असमन्वयाचेही दर्शन यानिमित्ताने समोर आले आहे. शिस्तबद्ध समजल्या जाणाºया भाजपातील चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध अविश्वास दाखवत दंड थोपटल्याने पक्षश्रेष्ठी आता त्याबद्दल काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहणार आहे.