शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अज्ञानाच्या आवरणामुळे आत्मरूप अस्पष्ट :महंत रामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 19:01 IST

मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला.

येवला : मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला. तळवाडे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी पाचव्या प्रवचनाचे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर येवला पंचायतचे सभापती रूपचंद भागवत, ह.भ.प. मधू महाराज उपस्थित होते.आपल्या विवेचनात महंत रामगिरी यांनी, देव नाही म्हणणाऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. अग्नी लाकडात असतो, पण घर्षण झाल्याशिवाय दिसत नाही, दुधात तूप असतेच पण ते दुधाचे दही लोणी केल्यावरच दिसते. ब्रह्म जाणण्यासाठी मतिमंदता चालत नसते. थोडे संकट आले तर लोक विचारतात देव आहे कुठं? पण देव ही काही सामान्यरूपात दिसण्याची गोष्ट नाही. देव अनुपेक्षा छोटा आणि ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम