शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

उत्तर महाराष्टवर कायमच अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:09 AM

शासनाने उत्तर महाराष्टवर कायमच अन्यायाची भूमिका ठेवली आहे. मग ते विकासकामे राहो अथवा मुख्यमंत्री पद व इतर मंत्री पदे असू द्या, उत्तर महाराष्टला कायमच उपेक्षित ठेवले असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

मालेगाव कॅम्प : शासनाने उत्तर महाराष्टवर कायमच अन्यायाची भूमिका ठेवली आहे. मग ते विकासकामे राहो अथवा मुख्यमंत्री पद व इतर मंत्री पदे असू द्या, उत्तर महाराष्टला कायमच उपेक्षित ठेवले असल्याचे प्रतिपादन माजी  महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. कॉँग्रेसचे नेते प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भायगाव रस्त्यावरील तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात खडसे बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, प्रसाद हिरे यांचे सर्व क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यात आपण त्यांना हवी ती मदत कर-ण्यास तयार आहोत. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शासनाने ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन २५ हजार ते दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले तरी शेतकरी समाधानी नाही. याचा गांभीर्याने विचार करावा तर यात आपल्या उत्तर महाराष्टवर कायमच अवकृपा राहिली आहे. मोठ-मोठ्या पाणीपुरवठा योजनांसह अनेक बाबींसाठी उत्तर महाराष्टÑाला पिछाडीवर ठेवले आहे. तर यात गेल्या चार दशकांपासून महाराष्टचा मुख्यमंत्री हा एकतर मराठवाडा, विदर्भ, कोकण मुंबई या भागातुन असतो. उत्तर महाराष्टचा मुख्यमंत्री झाला की कधी असा खडसे यांनी प्रश्न यावेळी केला. तसेच या भागावर सतत अन्यायाची भावना त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे आमदार सुधीर तांबे, कॉँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. हेमलता पाटील, अमृता पवार, डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर सर्वसामान्यांचे बापू हे श्रीकांत वाघ लिखित पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमास अभीष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष हरिलाल अस्मर, समाधान हिरे, नगरसेवक नीलेश आहेर, जयप्रकाश पाटील, मदन गायकवाड, अ‍ॅड. ज्योती भोसले, उपमहापौर सखाराम घोडके, संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पवार, लकी गील, नितीन पोफळे, मधुकर हिरे, माजी आमदार अनिल आहेर आदी उपस्थित होते.  जगन्नाथ धात्रक, संजय चव्हाण, मविप्र संचालक माणिकराव बोरस्ते, देवराज गरुड, संदीप बेडसे आदिंसह शिक्षक, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले. सूत्रसंचलन केवळ हिरे, अमोल निकम यांनी केले. सध्या राज्याची स्थिती चांगली नाही. त्यासाठी चांगली करण्यासाठी प्रयत्न होत आहेत पण ही परिस्थिती एवढ्या तीन वर्षांत झालेली नाही. यापूर्वीचे सरकारदेखील या परिस्थितीला जबाबदार आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली तरीही शेतकरी नाराज आहे. यामध्ये शासनाचा नव्हे तर निसर्गचक्र, अवकृपा, कधी खूप पाऊस तर कधी न होणे ही कारणे तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्हीही सरसकट कर्जमाफी करा असा आग्रह शासनाकडे धरला आहे. - दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे