शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
3
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
4
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
5
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
6
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
7
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
8
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
9
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
10
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
11
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
12
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
13
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
14
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
15
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
16
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
17
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
18
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
19
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
20
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक भरती प्रक्रीया : आमिषावर विश्वास ठेवाल तर आर्थिक फसवणूकीचे बळी व्हाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 20:01 IST

काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे

ठळक मुद्देनाशिक वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत१७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले२० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित

नाशिक :नाशिक, अहमदनगर वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत. यासाठी नुकतीच १२० गुणांची लेखी परीक्षा आॅनलाइन पध्दतीने घेतली गेली. नाशिक वनृत्तासाठी तब्बल ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेत ४५टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शारिरिक मैदानी चाचणीला आता सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, वनरक्षक भरती प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शी राबविली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित असून अवैध मार्गाने जे उमेदवार या भरती प्रक्रीयेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सांगितले. त्यामुळे कु ठल्याही प्रकाररे आमिष, प्रलोभनांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवता संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. याअंतर्गत नाशिक वनवृत्तात केवळ ४४पदे भरावयाची आहेत. त्यासाठी एकूण ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून लेखी परिक्षेत फक्त १७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले. या उमेदवारांची येत्या मंगळवारी (दि.१३) या उमेदवारांची शारिरिक तपासणी तसेच आवश्यक त्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी येत्या २० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार आहे. स्थानिक आदिवासी तालुक्यांमधील तरूणांसाठी २६ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यासाठी त्यांनाही भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे.वनरक्षक भरती प्रक्रीया ही संपुर्णत: पारदर्शी आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविली जात आहे. त्यामुळे या भरतीत कुठल्याहीप्रकारे अवैध बाबींना थारा नसल्याचे फुले यांनी स्पष्ट केले आहे. काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे, तसेच गैरमार्गाचा क ोणीही अवलंब करत असल्याचा संशय आल्यास त्याबाबत थेट तक्रार करावी, योग्य तक्रारींची निश्चित स्वरूपात दखल घेतली जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग