शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक भरती प्रक्रीया : आमिषावर विश्वास ठेवाल तर आर्थिक फसवणूकीचे बळी व्हाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 20:01 IST

काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे

ठळक मुद्देनाशिक वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत१७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले२० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित

नाशिक :नाशिक, अहमदनगर वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत. यासाठी नुकतीच १२० गुणांची लेखी परीक्षा आॅनलाइन पध्दतीने घेतली गेली. नाशिक वनृत्तासाठी तब्बल ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेत ४५टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शारिरिक मैदानी चाचणीला आता सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, वनरक्षक भरती प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शी राबविली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित असून अवैध मार्गाने जे उमेदवार या भरती प्रक्रीयेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सांगितले. त्यामुळे कु ठल्याही प्रकाररे आमिष, प्रलोभनांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवता संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. याअंतर्गत नाशिक वनवृत्तात केवळ ४४पदे भरावयाची आहेत. त्यासाठी एकूण ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून लेखी परिक्षेत फक्त १७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले. या उमेदवारांची येत्या मंगळवारी (दि.१३) या उमेदवारांची शारिरिक तपासणी तसेच आवश्यक त्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी येत्या २० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार आहे. स्थानिक आदिवासी तालुक्यांमधील तरूणांसाठी २६ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यासाठी त्यांनाही भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे.वनरक्षक भरती प्रक्रीया ही संपुर्णत: पारदर्शी आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविली जात आहे. त्यामुळे या भरतीत कुठल्याहीप्रकारे अवैध बाबींना थारा नसल्याचे फुले यांनी स्पष्ट केले आहे. काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे, तसेच गैरमार्गाचा क ोणीही अवलंब करत असल्याचा संशय आल्यास त्याबाबत थेट तक्रार करावी, योग्य तक्रारींची निश्चित स्वरूपात दखल घेतली जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग