शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वनरक्षक भरती प्रक्रीया : आमिषावर विश्वास ठेवाल तर आर्थिक फसवणूकीचे बळी व्हाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 20:01 IST

काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे

ठळक मुद्देनाशिक वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत१७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले२० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित

नाशिक :नाशिक, अहमदनगर वनवृत्तामध्ये ४४ वनरक्षक पदे भरावयाची आहेत. यासाठी नुकतीच १२० गुणांची लेखी परीक्षा आॅनलाइन पध्दतीने घेतली गेली. नाशिक वनृत्तासाठी तब्बल ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेत ४५टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शारिरिक मैदानी चाचणीला आता सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, वनरक्षक भरती प्रक्रिया संपुर्णपणे पारदर्शी राबविली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रीया गुणवत्तेवर अधारित असून अवैध मार्गाने जे उमेदवार या भरती प्रक्रीयेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सांगितले. त्यामुळे कु ठल्याही प्रकाररे आमिष, प्रलोभनांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवता संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रीया राबविली जात आहे. याअंतर्गत नाशिक वनवृत्तात केवळ ४४पदे भरावयाची आहेत. त्यासाठी एकूण ९ हजार ७९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून लेखी परिक्षेत फक्त १७५ परिक्षार्थी उत्तीर्ण होऊ शकले. या उमेदवारांची येत्या मंगळवारी (दि.१३) या उमेदवारांची शारिरिक तपासणी तसेच आवश्यक त्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांनी येत्या २० तारखेला धावण्याच्या स्पर्धेला सामोरे जावे लागलणार आहे. स्थानिक आदिवासी तालुक्यांमधील तरूणांसाठी २६ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यासाठी त्यांनाही भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमधून जावे लागणार आहे.वनरक्षक भरती प्रक्रीया ही संपुर्णत: पारदर्शी आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविली जात आहे. त्यामुळे या भरतीत कुठल्याहीप्रकारे अवैध बाबींना थारा नसल्याचे फुले यांनी स्पष्ट केले आहे. काही समाजकंटक व स्वहीत साधणारे लोक याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशा लोकांपासून सावध रहावे, तसेच गैरमार्गाचा क ोणीही अवलंब करत असल्याचा संशय आल्यास त्याबाबत थेट तक्रार करावी, योग्य तक्रारींची निश्चित स्वरूपात दखल घेतली जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग