शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

...अखेर वन्यजीवांविषयी वनविभागाने दाखविली ‘आस्था’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST

‘रोडकिल’च्या घटना नाशिक पश्चिम भागातील राज्य, राष्ट्रीय रेसर महामार्गावर वारंवार घडतच आहे. याबाबत अनेकदा वन्यजीवप्रेमींकडून ओरड केली जाते; मात्र ...

‘रोडकिल’च्या घटना नाशिक पश्चिम भागातील राज्य, राष्ट्रीय रेसर महामार्गावर वारंवार घडतच आहे. याबाबत अनेकदा वन्यजीवप्रेमींकडून ओरड केली जाते; मात्र वनविभागाकडून याबाबत तातडीने दखल घेतली जात नव्हती. सावधगिरीचा इशारा देणारे फलक लावल्यानंतर वन्यजीवांचे अपघात थांंबतील, असे नसले तरीदेखील जनप्रबोधन होऊन किमान यामध्ये घट तरी येईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

वन्यजीव सप्ताहपुरते केवळ वन्यजीव वाचविण्याचा कळवळा दाखवुन उपयोग नसून वन्यजीव वाचविण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी होणेदेखील तितकेच गरजेचे आहे.नाशिक पश्चिम वनविभागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या चार वनपरिक्षेत्रांमधील विविध राज्य, राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांना अज्ञात वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने बिबट्या, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यजीव बळी ठरतात. ‘लोकमत’ने याबाबत सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वनविभागाने तातडीने नाशिक वनपरिक्षेत्रातील मुंबई-आग्रा महामार्गालगत रायगडनगर, इगतपुरीजवळ नाशिक- पुणे महामार्गावरील मोहदरी घाटाच्या प्रारंभी तसेच सिन्नर-घोटी राज्य मार्गावर आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी, वासाळी, पेगलवाडी गावाजवळ ‘वन्यजीवांचा वावर, वाहने हळु चालवा’ असे फलक सचित्र उभारले आहेत.

--इन्फो--

‘इको-एको’ही सरसावली

‘लोकमत’चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील इको-एको वन्यजीव संस्थेनेही पुढाकार घेत फलक उभारणीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. या संस्थेने त्र्यंबकेश्वर मार्गावर पहिल्या टप्प्यात चार फलक उभारले आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुंबई-आग्रा महामार्ग आणि त्र्यंबक-जव्हार, पेठ राज्यमार्गांवर फलक लावण्यात येणार असल्याची माहिती वैभव भोगले यांनी दिली. सध्या उभारण्यात आलेले फलकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रात्रीच्यावेळी वाहनांच्या प्रकाशात लख्खपणे डोळ्यांपुढे सहज चमकतो. या फलकांसाठी वापरण्यात आलेले ‘रिफ्लेक्टर’ आणि ‘रेडियम’ हे जास्त दिवस टिकणारे असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.

---

फोटो आरवर २४फॉरेस्ट आणि २४ फॉरेस्ट१ नावाने सेव्ह आहे.