शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

त्रयस्थ कंपनीमार्फत फेरसर्वेक्ष

By admin | Updated: November 18, 2014 00:53 IST

त्रयस्थ कंपनीमार्फत फेरसर्वेक्ष

नाशिक : छत्तीसगढहून महाराष्ट्रात आणण्यात येणाऱ्या विजेसाठी नॅशनल पॉवर ग्रीडच्या वतीने टाकण्यात येणाऱ्या उच्च दाब वाहिन्यांच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्रयस्थ कंपनीमार्फत फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तोपर्यंत काम स्थगित करण्याची सूचना नॅशनल पॉवर ग्रीडचे अध्यक्ष आर. एन. नाईक यांनी दिल्या आहेत. चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद पाडण्यात आलेले काम सुरू करण्यापूर्वी विरोध असलेल्या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने नॅशनल पॉवर ग्रीडला केली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवून बागायती क्षेत्रातून वीज वाहिनी नेण्यापेक्षा जिरायती व वन खात्याच्या ताब्यातील जागेतून टॉवर्स व वाहिनी नेण्यात यावी, अशी सूचना केली. ज्या मार्गावरून वाहिनी जाणार आहे त्या मार्गावर सर्वत्र द्राक्ष पिके असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी नुकसान कसे होईल यावर लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले; परंतु शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. शिरवाडे वणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून वाहिनी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद््ध्वस्त झाल्याचे उदाहरण देण्यात आले. त्याच बरोबर वीज तारा ओढण्यासाठी लावण्यात येणारी यंत्रसामुग्री व कामकारांच्या वर्दळीनेदेखील शेतीचे नुकसान होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कंपनीने पर्यायी जागेचा विचार करून काम करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कंपनीची बाजू मांडताना अध्यक्ष आर. एन. नाईक यांनी, छत्तीसगढ येथे उत्पादित करण्यात येणारी वीज महाराष्ट्रात आणण्याचे काम केले जात असून, त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे काम करायचे की नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे व त्यासाठी पर्यायी मार्ग किंवा तडजोड करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले. त्यावर शेतकऱ्यांनी सुचविलेला मार्ग व कंपनीचा मार्ग तपासून पाहण्यासाठी गुजरातच्या कंपनीची नेमणूक करून नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल. तटस्थ यंत्रणेने केलेल्या या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर पुन्हा एकवार कंपनी, शेतकऱ्यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)