शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

हाताला काम मिळाल्याने परप्रांतीयांचा गावी जाण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:13 IST

सातपूर : कोरोनामुळे रोजगार गेल्याने उपासमार व्हायला लागली म्हणून औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघाले आहेत. पण उद्योग सुरू झाल्याने हाताला काम मिळू लागले म्हणून काही परप्रांतीय कामगारांनी नाशिकमध्येच राहण्याचा निश्चय केला आहे. अन्य कामगारांनीही जाऊ नये म्हणून आग्रह धरीत आहेत.

ठळक मुद्देउद्योग सुरू झाल्याने समाधानी : गावाकडे जाणाऱ्या जत्थांच्या विपरीत चित्र

गोकुळ सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : कोरोनामुळे रोजगार गेल्याने उपासमार व्हायला लागली म्हणून औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघाले आहेत. पण उद्योग सुरू झाल्याने हाताला काम मिळू लागले म्हणून काही परप्रांतीय कामगारांनी नाशिकमध्येच राहण्याचा निश्चय केला आहे. अन्य कामगारांनीही जाऊ नये म्हणून आग्रह धरीत आहेत.गावाकडे जाऊन काय करणार, तिकडेही अशीच परिस्थिती आहे. आता येथे काम मिळाल्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असा ठाम विश्वास या कामगारांनी व्यक्त केला आहे.कोरोना विषाणूजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २४ मार्चपासून लॉकडाउन आणि संचारबंदी जाहीर केल्याने कारखाने पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. या लॉकडाउनच्या काळात कारखान्यात काम करणाºया कंत्राटी कामगारांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. लॉकडाउनच्या काळात सामाजिक संस्था, दानशूर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू आणि पोटासाठी अन्न मिळाले. परंतु लॉकडाउन कधी संपणार, संपल्यानंतर रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने या कामगारांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर या कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघालेत. काही खासगी वाहनाने तर काहींची व्यवस्था सरकारने केली.एकीकडे असे चित्र असले तरी लॉकडाउनमध्ये २० एप्रिलनंतर शिथिलता दिल्याने कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. कारखाने सुरू झालेत आणि कंत्राटी कामगारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामगारांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.काही दिवसांतच सर्व काही व्यवस्थित होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. पोटापाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांनी गावाकडे जाण्याचा निर्णय बदलला आहे. अन्य सहकारी कामगारांनीही येथेच थांबावे, गावाकडे जाऊ नका असा आपुलकीचा सल्ला हे कामगार एकमेकांना देत आहेत.गावाकडे जाण्याचा विचार मनात आला होता; पण लॉकडाउनच्या काळात कंपनी मालकाने आम्हाला पूर्ण वेतन दिले. शिवाय आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. आम्हाला धीर दिला. गावाकडे गेलो असतो तर तेथेही कोरोना आहेच. तेथे जाऊन काय करणार? चौदा दिवस क्वारंटाइन व्हावे लागले असते. त्यामुळे नाशिकमध्ये राहणेच सोयीचे आहे.- बंकिमचंद्र मुरमू पारडी, पुरु लिया, पश्चिम बंगाल रोजीरोटीसाठी आपल्या शहरात आलेले परराज्यांतील कामगारांना धीर देण्याचे प्रत्येकाने केले पाहिजे. स्थानिक आणि परप्रांतीय असा दुजाभाव कधीही केला नाही. कंपनी म्हणजे एक कुटुंब, परिवार आहे. कंत्राटी असला तरी परिवाराचा एक सदस्य आहे. प्रत्येक सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना वाºयावर कसे सोडता येईल. कठीण काळात त्यांना सांभाळून घेतले आहे.- विवेक पाटील, संचालक, युनायटेड हिट ट्रान्सफर, अंबडलॉकडाउनमध्ये कंपनी बंद होती. म्हणून गावाकडे जायचे होते, परंतु गावाकडे जाऊन काम मिळेल का, असा विचार केला आणि गावाला जाण्याचे रद्द केले. आमच्या कंपनी मालकाने आम्हाला राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. पूर्ण पगार दिला. आमच्या गावातील लोकांनीसुद्धा आमची एवढी काळजी घेतली नसती. उलट त्रासच झाला असता. - राजेश प्रजापती, आझमगड, उत्तर प्रदेशकोरोना संपूर्ण देशात आहे.गावाला गेलो तर गाव आपल्याला घेईल का, तेथे काम मिळेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. लॉकडाउनच्या दोन महिन्यांच्या काळात आमच्या कंपनी मालकाने आम्हाला खूप धीर दिला. आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. आता कोणतीही भीती राहिली नाही. कंपनी सुरू झाली. काम सुरू झाले. आता गावाला जाण्याची गरज राहिलेला नाही.- शंकर यादव, भागलपूर, बिहार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी