शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

निवडणूकविषयक खटले निकाली काढण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:16 IST

नाशिक : लोकसभा, विधानसभा वा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रियेसंबंधी दाखल झालेले गुन्हे व न्यायालयात पाठविलेले खटले ...

नाशिक : लोकसभा, विधानसभा वा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रियेसंबंधी दाखल झालेले गुन्हे व न्यायालयात पाठविलेले खटले तत्काळ निकाली काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असून, आता अधिकाºयांना अशा खटल्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मुळात निवडणूकविषयक खटले पोलीस वा संबंधित व्यक्तींच्या अखत्यारित असताना या कायदेशीर बाबीत निवडणूक अधिकाºयांनी कसा हस्तक्षेप करावा, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शी व विनावाद पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून काटेकोर तयारी करून घेतली जात असून, आयोगाविषयी मतदारांच्या मनात कोणताही संशय राहू नये यासाठी बारीकसारीक गोष्टींची पूर्तता करून घेतली जात आहे. नवमतदारांची नोंदणी, दुबार नावांची वगळणी, वयाची शंभरी गाठलेले मतदार, तृतीयपंथी मतदार, अपंग मतदार अशांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी दररोज नवनवीन सूचना आयोगाकडून दिल्या जात असून, मतदान केंद्राची तयारी, वीज, पाणी, रॅम्पची सुविधा याबाबत दररोज अधिकाºयांकडून आढावा घेतला जात असताना आता सन २००९ व २०१४ या दोन्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित किती गुन्हे दाखल झाले आहेत, या गुन्ह्णांची सद्यस्थिती, खटल्यांची सुनावणी आदी माहिती आता आयोगाने सर्व अधिकाºयांकडून मागविली आहे. अशा गुन्हे वा खटल्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी निपटारा करण्यात यावा, अशा सूचना त्याबरोबर देण्यात आल्या आहेत. अधिकाºयांनी अशा खटल्याची माहिती घेऊन संबंधित न्यायालयाला खटल्यांची लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याची विनंती करावी, प्रसंगी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाºयांनी न्यायालयांना विनंती पत्र लिहावे, असा आग्रह आयोगाने धरला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी निवडणूक विषयक कामाला लागले असून, निवडणूक खटल्यांची माहिती गोळा केली जात आहे. तथापि, ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाब असून, अशा प्रकरणात निवडणूक अधिकाºयांचा हस्तक्षेप कायदेशीरदृष्ट्या योग्य होईल काय? असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे. निवडणूक विषयक बहुतांशी खटले पोलिसांकडून दाखल केले जातात किंवा राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करतात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या खटल्यात थेट निवडणूक अधिकाºयांचा काहीच संबंध येत नाही. परिणामी अशा खटल्यांमध्ये अधिकाºयांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न न्यायालय खपवून घेईल काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक