शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:27 IST

राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही

ठळक मुद्देराज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे स्पष्टीकरण ७२ तासात अधिकारी तक्रारीची दखल घेऊन निराकरण करतील

नाशिक : सिनेमागृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेण्यावर बंदी नाहीच, परंतु ग्राहकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने व अशी बंदी लादणा-यांना कोणी जाब विचारीत नसल्यामुळे फावते. त्यामुळे सिनेमागृहाचे काम सिनेमा दाखविण्याचे असून, खाद्यपदार्थ बंदी घालण्याचे नाही अशा शब्दात राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी यापुढे जिल्हा पुरवठा विभागाकडे ग्राहकांनी आपल्या तक्रारी कराव्यात असे आवााहनही त्यांनी केले आहे.राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण्यात आलेला आहे. परंतु सिनेमागृह चालकाचा आणि खाद्यपदार्थाचा काही एक संबंध नाही. बाहेरील पाणी व खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी घालून त्यांच्याकडील महागडी वस्तु ग्राहकाच्या माथी मारण्याचाच हा प्रकार असून, यापुढे अशी सक्ती करणा-यांकडे या संदर्भातील परवानग्या आहेत काय याची विचारणा करा असा सल्लाही अरूण देशपांडे यांनी दिला. ग्राहकांचे अधिकार प्रामुख्याने खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेबाबत अधिक आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थाबाबत काहीही तक्रार असेल तर ग्राहकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर करावी ७२ तासात अधिकारी त्याची दखल घेऊन निराकरण करतील असेही सांगितले. ग्राहकांना कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी थेट न्यायालयात धाव घेण्याची गरज नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घ्यावी. ग्राहकहिताच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे यापुढे ग्राहकांनी लिखीत स्वरूपात तक्रार करावी. संबंधित खात्याच्या अधिका-यांकडे तक्रारी पाठवून त्याचे निराकरण करण्यात येईल तसेच तालुका पातळीवरील तक्रारीसाठी पुरवठा खात्याच्या नायब तहसिलदारांकडे तक्रारी करता येतील असेही त्यांनी सागिंतले. ग्राहकहितासाठी डिसेंबर महिन्यात राज्यातील ३१० तालुक्यात चारशेहून अधिक ग्राहक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले असून, ग्राहक जागा झाल्यास त्याची फसवणूक होण्याची शक्यताच नसल्याचेही शेवटी अरूण देशपांडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक