शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पाठोपाठ आता जिल्ह्यात 'सारी'ची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:10 IST

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देतपासणीत १७ रुग्ण : आरोग्य विभागाची तत्परता

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना त्यात आता 'सारी' रुग्णाचीही भर पडली असून, या आजाराने औरंगाबाद येथे घेतलेले बळी पाहता, सारीचे रुग्ण सापडताच त्याची कोविड टेस्ट करून तत्काळ उपचार केले जात आहेत.कोरोना रुग्णासारखीच लक्षणे असणाऱ्या सारी आजारात प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास होणे, खूप ताप, सर्दी, खोकला लागणे, फुप्फुसात सूज येणे, अल्पावधीत रुग्ण गंभीर होणे असे लक्षणे आहेत, त्यामुळे सध्या कोरोनासारखीच लक्षणे दिसणाºया परंतु कोरोना नसणाºया रुग्णाला कोविडप्रमाणेच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते सारी हा आजार यापूर्वीदेखील होता, फक्त त्याचे निदान होत नव्हते, आता कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यावर प्रामुख्याने सारी आजाराचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक गावात आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटर सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सारी आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत, या आजाराच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेण्यात येत असून, कालपर्यंत १७ रुग्ण सारी आजाराने बाधित असल्याचे सांगण्यात आले, त्यात चांदवडला तीन व कळवणला १४ रुग्ण आढळून आले, त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.मात्र सारी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सारी आजाराचे विषाणू अनेक प्रकारचे असल्याने त्याला अगोदर प्रतिबंध करणे अवघड असले तरी या रुग्णांना वेळेवर जलदगतीने उपचार मिळणे हेच महत्त्वाचे मानले जाते.अशा प्रकारचे रुग्ण सापडल्यास त्याचेही घश्याचे नमुने घेऊन ते कोरोना प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोरोना प्रतिबंधित उपाय केले जात आहेत, तर निगेटिव्ह असल्यास सारीवर उपचार केले जात आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या मते, डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या साथीच्या काळातही सारी आजार कायम होता, मात्र या साºया आजारावर टॉमी फ्लूची औषधे गुणकारी ठरली होती, आताही कोरोनाबाधित किंवा सारी आजाराने पीडित रुग्णाला दोन टॉमी फ्लू दिले जात आहे. औरंगाबाद येथे सारीने अनेक बळी घेतले आहेत, नाशिक जिल्ह्यात मात्र सारीचे रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य