शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

भोजापूर खोऱ्यात चारा, पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 19:02 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने प्रथमच या भागात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांकडे असणारा चाराही संपुष्ठात आला असून विहीरींनी तळ गाठल्याने भोजापूर खोºयात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

भोजापूर खोरे परिसराला वरदान ठरलेली म्हाळुंगी नदी कोरडीठाक पडल्याने नदीकाठच्या गावांनाही त्याचा त्रास जाणवू लागला आहे. तालुक्यातील भोजापूर परिसर हा बागायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परिसरात चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी या भागाचा समावेश गावालगतच भोजापूर धरणाची निमिर्ती करण्यात आली आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच चारही गावचा पिण्याच्या पाण्याच्या व शेतीचा प्रश्न अवलंबवून आहे. या भागात पावसाचे प्रमाणही चांगल्या प्रमाणात आहे. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानतंर धरणातून म्हाळुंगी नदीद्वारे विसर्ग सुरू असतो. त्यामुळे या भागात प्रामुख्याने पाणी टंचाई जाणवत नाही. पंरतू अलीकडच्या काळात पावसाचे झालेले कमी प्रमाण, अत्यल्प पाऊस यामुळे बागायती पट्ट्यातही पाणी प्रश्न गंभीर बनवू लागला आहे. गतवर्षी सिन्नर तालुक्यासह सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी स्थिती अनुभवयाला मिळत आहे. भोजापूर क्षेत्रात सुध्दा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून जास्त दिवस न वाहिल्याने सुरूवातीपासूनच नदी कोरडीठाक पडली आहे. भोजापूर परिसरात गेल्या काही वर्षापासून डाळिंब पिकांचे क्षेत्र चांगल्या प्रमाणात वाढले आहे. नळवाडी येथील बहुतांशी शेतक-यांनी टॅँकरने पाणी विकत घेवून डाळिंब बागा जगविल्या होत्या. मात्र गत महिन्यात झालेल्या बेमोसमी गारांच्या पावसाने डाळिंब बागा भुईसपाट झाल्या आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक विंवचनेत सापडला आहे. परिसरातील विहीरींनी तळ गाठला असून गावाच्या पूर्वेकडील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. वाड्या वस्त्यांवरील पाण्याची परिस्थिती गंभीर होवू लागली आहे. वाड्या वस्त्यांवर टॅँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई