शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

फरशी पूल बनले धोकेदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:23 IST

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मजबूत पुलाची शास्रशुद्ध पद्धतीने बांधणी केली. मात्र पूरपाण्याच्या प्रवाहामुळे पुलासाठी टाकण्यात आलेला भराव व पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.चणकापूर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागत आहे. चणकापूर भागातून कनाशी भागात जाण्यासाठी अभोणामार्गे अधिक अंतर पडत असल्यामुळे कमी वेळात व कमी अंतरात कनाशी गाठण्यासाठी धरणाखालील रस्ता हा जवळचा आहे. त्यामुळे पुलावरील वर्दळ वाढली होती. शिवाय चणकापूर येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक अर्जुनसागर (पुनंद), भेगू, सापुतारा येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. चणकापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर परिसरातील पर्यटक चणकापूर धबधबा परिसरात गर्दी करतात. या धबधब्यावर जाण्यासाठी पुलाचा मार्ग सोयीस्कर ठरतो. एकदिवसीय सहलीसाठी तालुक्यातील पर्यटकांची पहिली पसंती चणकापूर असते. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर पावसाळ्यात व धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या धबधब्यामुळे आकर्षणाचे केंद्र ठरतो.तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडल्याने धबधब्यांचे सौंदर्य जवळून न्याहाळता येते. कनाशीकडून येणाºया रस्त्यावर घनदाट वृक्षराई पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.उन्हाळ्यात येथे चौपाटी व वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे धरणाखालील पूल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मात्र सद्य:स्थितीत परिसरातील गिरणा नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने व पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक