शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांना पूर

By admin | Updated: July 10, 2016 22:53 IST

नद्यांना पूर

 नाशिक : शहरासह परिसरात शनिवारी सकाळपासून झालेल्या संततधारेने गोदावरीसह वाघाडी, नासर्डी व दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, या नद्यांच्या काठावरील झोपडपट्टीधारक तसेच रहिवाशांना सावधानतेचा इशारा म्हणून तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुख्य रस्त्यांवर उघड्यावर बसणारे व्यावसायिक तसेच विविध चौकांमध्ये व रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांचीही अडचण झाली. मोकळे भूखंड झाले जलमयपंचवटी परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहने अडकून पडली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या काही टपऱ्या वाहून गेल्या. शनिवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम असल्याने याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे. तसेच रामकुंड परिसरात नदीकाठी असलेल्या काही दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे मुख्य रस्ते तसेच मोकळे भूखंड जलमय झाले. या संततधारेमुळे वाघाडी नाला व गोदावरीला पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली होती.कॉलनी रस्त्यांची लागली वाटगंगापूररोड परिसरातील विविध कॉलनी परिसरात पाणी साचल्याचे चित्र होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक चेंबर्स क्षमतेपेक्षा अधिक वाहत होते. अनेक ठिकाणी चेंबरमधील मैलायुक्त पाणी बाहेर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गंगापूररोडप्रमाणेच सातपूर, कामटवाडे परिसरातही अंतर्गत कॉलनी रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरातही गुडघाभर पाणी साचले असून, या परिसरातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागाकडे पाठ फिरवली असून, गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात नवीन रस्तेदेखील बांधण्यात आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी भूमिगत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम झाले असले तरी या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांनी या परिसरात अधिकच चिखल झाला असून, गाडी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी चिखल तसेच साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वृत्तपत्रविक्रेता घसरून पडण्याची घटना घडली आहे. या सखल भागात तब्बल गुडघाभर पाणी असल्याने पायी चालणे मुश्किल झाले असून, दुचाकी वाहनांच्या इंजिनमध्येही पाणी जाऊन ही वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत असून, तातडीने तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.जागोजागी पाणी तुंबले नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प भागात भूमिगत गटारींमध्ये कचरा अडकल्याने सर्वत्र पावसाचे पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांनी फावडे, कुदळ आदि सामान घेऊन चेंबरचे झाकण उघडे करण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर व काही सखल भागात घरे व झोपड्यांत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकरोड भागात रविवारी दिवसभर व सायंकाळी विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे सर्व अंधाराचे साम्राज्य होते. कंपन्यांसमोर गुडघाभर पाणी सातपूरच्या त्रंबकरोडवर पपया नर्सरी, अंबड-सातपूर लिंकरोडवर आझाद चौक, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सर्कल, मायको सर्कल कंपनीसमोर गुडघाभर पाणी साचले होते. तसेच एबीबी सर्कल, श्रीराम चौक, सातपूर कॉलनी भागात अनेक चौकात पाणी साचल्याने रस्ते जलमय होऊन वाहतूक खोळंबली होती. नासर्डी नाल्याला पूर आल्याने आयटीआयनजीकच्या झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या. सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगर, आनंदवली, नवश्या गणपती आदि ठिकाणच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. काही ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत पुरवली. नासर्डी नदीला पूर आल्याने नदीच्या किनाऱ्यावरील रहिवाशांना फटका बसला. नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. नदीला पूर आल्याने काठावरील राहिवाशांची धावपळ उडाली (लोकमत चमू)