शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:46 IST

कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे.

नाशिक : कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे. याच क्रमात शुक्रवारी सांयकाळी हिरे कुटुंबीयांच्या उंबºयात भुजबळ कुटुंबीयांच्या सदस्याने स्वत:हून हजेरी लावल्याने त्याची राजकीय चर्चा घडली नसती तर ते नवलच ठरले असते. एकेकाळी एकमेकांना राजकीय आखाड्यात पाहून घेण्यासाठी शड्डू ठोकून बाह्या सरसावणाºयांना ‘झाले गेले गंगेला मिळाले’असे म्हणण्याची वेळ का यावी याचीही त्यानिमित्ताने चर्चा होणे साहजिकच आहे.  जिल्ह्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. सत्ताधाºयांची ताकद गेल्या चार वर्षांत जितकी वाढली तितकीच नाराजीही कायम आहे. आजचे विरोधक ज्यावेळी सत्ताधारी होते, त्यावेळी यापेक्षा वेगळी परिस्थिती नसली तरी, त्याचा गवगवा मात्र खूप झाला होता. जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व ओघानेच आलेल्या गुन्हेगारी घटनेलादेखील भुजबळ हेच जबाबदार असल्याचे चित्र रंगविण्यात भुजबळांचे विरोधक त्याकाळी जसे पुढे होते, तसेच स्वपक्षीयदेखील त्याचे भांडवल करण्यात अग्रभागी होते. त्याचाच फटका २०१४ च्या लोकसभेत बसला व खुद्द छगन भुजबळ यांनाच राजकीय विजनवास पत्करावा लागला.भुजबळांचे जिल्ह्यातील जे जे विरोधक म्हणून गणले गेले त्यात हिरे कुटुंबीयदेखील मागे नव्हते. अशातच भुजबळ यांची सद्दी संपविण्यासाठी प्रशांत हिरे यांच्या धाकल्या पुत्राने थेट समोरा समोर येऊन दोन हात करण्याचे आव्हान देऊन राजकीय वर्तुळात टाळ्या मिळविल्या होत्या. त्यामुळे भुजबळ व हिरे यांच्यातील वाद जिल्ह्यातील राजकारणात जाहीरपणे उफाळून आला होता. आता चार, साडेचार वर्षांत भुजबळांना त्यांची संपलेली सद्दी जशी परत मिळविण्याची गरज निर्माण झाली, तशीच ती हिरे कुटुंबीयांचीदेखील निकड बनली आहे.कॉँग्रेसचा वारसा सांगणाºया या कुटुंबीयांनी सत्तेच्या काळात सेनेचे धनुष्य पेलले, त्यानंतर सत्तांतरात राष्टÑवादीचे घड्याळ हातात बांधले, भाजपाचा सर्वत्र बोलबाला झाल्यानंतर ते कमळाच्या पाठीमागे धावले परंतु आता मात्र त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी त्यांना ‘जुनं ते सोनं’ असे वाटू लागल्याने त्यांनी वरच्यावर अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्या भेटी घेऊन राष्टÑवादी प्रवेशासाठी अधिरता दाखविल्याचेही दिसून आले.परंतु भुजबळ यांच्या तुरुंगातील सुटकेमुळे तो प्रवेश रोखला गेल्याची चर्चा होत आहे. आॅगस्टमध्ये होणाºया त्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी पक्षश्रेष्ठी राजी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या हिरे यांच्यासाठी नाशिकच्या दौºयावर येणाºया सर्वपक्षियांनी त्र्यंबकरोडवरील ‘मधुर मुरली’ भोवती रुंजी घालताना दिसून आले. हे करताना त्यातील राजकीय हेतू लपून राहिला नाही. ज्या राष्टÑवादीसाठी आतूर झालो, त्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अन्य राजकीय पर्याय खुले असल्याचे चित्र हिरेंनी निर्माण करण्यात यश मिळविले. नेमकी त्यांची हीच खेळी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या भुजबळ कुटुंबीयांना धोक्याची वाटली असावी, त्यामुळेच की काय एरव्ही भुजबळांसमोर हिरेंचे व हिरेंसमोर भुजबळ यांचे नाव घेण्यावर कडक निर्बंध असतानाही समीर भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करून विसरही पडलेल्या प्रशांत हिरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारच्या तिन्ही सांजेची वेळ निवडली. हाती भला मोठा पुष्पगुच्छ देऊन हिरे कुटुंबीयांच्या पुढील वाटचालीस त्यांनी जशा शुभेच्छा दिल्या, तशाच त्या हिरेंकडून भुजबळ कुटुंबीयांच्याही पदरात पाडून घेतल्या.दोन्ही कुटुंबीयांनी दीड दशकातील राजकीय वैमनस्य विसरून एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेताना आपापली राजकीय सोयदेखील यानिमित्ताने पाहून घेत, त्यातील अडचणींवर चर्चा केली. आता या राजकीय भेटीची चर्चा जो तो आपापल्यापरीने करण्यास मोकळा असला तरी, हिरे-भुजबळ यांनीही स्वत:ची सोय या भेटीच्या निमित्ताने करून घेतली आहे. या भेटीसाठी नेमका कोणाचा पुढाकार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :Prashant Hireप्रशांत हिरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण