शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पाच गाव नळ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: February 13, 2016 23:57 IST

कृत्रिम पाणीटंचाई : बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे साडेतीन लाख रुपये वीजबिल थकल्याने भोजापूर धरणावरील विहिरीचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा समिती व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पाणी योजना सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाला नळपारी पुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नांदूरशिंगोटे गावात शुक्रवारपासून नळ पाणीपुरवठा बंद झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन चार दिवस पाणी येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे. कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. भोजापूर धरणाव्यतिरिक्त परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोठेच स्त्रोत नसल्याने पाणी योजना बंद पडल्यास मोठी समस्या निर्माण होते. येथे आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. वाड्या-वस्त्यांनाही नळ पाणीपुरवठा योजनेतूनच पाणी दिले जात आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ व सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये येथे आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग, हॉटेल व्यावसायिक तसेच स्थानिक कुटुंबानाही पाणीपुरवठा योजना बंद असल्यास पाणी विकत घ्यावे लागते. योजनेत नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीची नेहमीच अग्रेसर भूमिका असते. पंचायतीची ठरलेली रक्कम नियमित असतानाही येथील ग्रामस्थांना नेहमीच पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. कणकोरीसह पाच गाव पाणी योजनेत नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावाला दर महिन्याची पाणीपट्टी ठरवून देण्यात आली आहे. परंतु, वेळेवर नियोजन होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने योजनेतील गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा समिती, सरपंच, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज पंप नादुरुस्त झाल्यानंतरच त्याकडे बघितले जाते.(वार्ताहर)