शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

पाच गाव नळ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: February 13, 2016 23:57 IST

कृत्रिम पाणीटंचाई : बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे साडेतीन लाख रुपये वीजबिल थकल्याने भोजापूर धरणावरील विहिरीचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा समिती व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पाणी योजना सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाला नळपारी पुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नांदूरशिंगोटे गावात शुक्रवारपासून नळ पाणीपुरवठा बंद झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन चार दिवस पाणी येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे. कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. भोजापूर धरणाव्यतिरिक्त परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोठेच स्त्रोत नसल्याने पाणी योजना बंद पडल्यास मोठी समस्या निर्माण होते. येथे आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. वाड्या-वस्त्यांनाही नळ पाणीपुरवठा योजनेतूनच पाणी दिले जात आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ व सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये येथे आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग, हॉटेल व्यावसायिक तसेच स्थानिक कुटुंबानाही पाणीपुरवठा योजना बंद असल्यास पाणी विकत घ्यावे लागते. योजनेत नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीची नेहमीच अग्रेसर भूमिका असते. पंचायतीची ठरलेली रक्कम नियमित असतानाही येथील ग्रामस्थांना नेहमीच पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. कणकोरीसह पाच गाव पाणी योजनेत नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावाला दर महिन्याची पाणीपट्टी ठरवून देण्यात आली आहे. परंतु, वेळेवर नियोजन होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने योजनेतील गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा समिती, सरपंच, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज पंप नादुरुस्त झाल्यानंतरच त्याकडे बघितले जाते.(वार्ताहर)