शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

पाच हजार व्यापारी बेपत्ता

By admin | Updated: April 2, 2015 00:53 IST

पाच हजार व्यापारी बेपत्ता

नाशिक : व्यापारी-व्यावसायिकांचा असहकार आणि शासनाची प्रतिकूल भूमिका या दुष्टचक्रात अडकलेल्या महानगरपालिकेच्या खजिन्यात मार्चअखेर सरचार्जसह ६७५ कोटी रुपये एलबीटी (स्थानिक संस्था कर) जमा झाला आहे. पालिकेने एलबीटीची थकबाकी आणि विवरणपत्र मुदतीत दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली; परंतु मार्चअखेर १७ हजार ५९२ व्यापारी-व्यावसायिकांनीच विवरणपत्र दाखल करत एलबीटीला प्रतिसाद नोंदविला आहे. सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांच्या अपूर्ण पत्त्यामुळे महापालिकेने आता त्यांची शोधमोहीम राबविण्याचे ठरविले असून, विक्रीकर खात्याकडून माहिती संकलित करून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.महापालिकेने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ७२० कोटी एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. परंतु गेल्या आर्थिक वर्षात व्यापाऱ्यांनी पुकारलेला असहकार आणि शासनाचीही एलबीटी रद्द करण्याबाबतची भूमिका यामुळे महापालिकेच्या वसुलीवर परिणाम होत गेला. महापालिकेला सुरुवातीला प्रतिमाह ५२ ते ५४ कोटी रुपये एलबीटी वसूल झाला. दिवाळीच्या दरम्यान वसुली ६३ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. नोव्हेंबरनंतर महापालिकेने एलबीटीची थकबाकी व मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आणि सुमारे साडेसात हजार व्यावसायिकांना नोटिसा बजावतानाच हजाराहून अधिक व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली होती. मात्र, व्यापारी महासंघाच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आयुक्तांना सांगावा आल्याने महापालिकेने कारवाई स्थगित केली होती. तरीही ३१ मार्चअखेर १७ हजार ५९२ व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल करत एलबीटीला प्रतिसाद दिला आहे. मात्र, पाच हजार व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा अपूर्ण पत्त्यामुळे परत आल्या असून, महापालिकेने आता त्यांची शोधमोहीम राबविण्याचे ठरविले आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर विक्रीकर विभागाने १६ हजार व्यापारी-व्यावसायिकांची यादी महापालिकेला सादर केली होती. या यादीत अनेक त्रुटी आढळून आल्याने महापालिका वर्षभर चाचपडतच राहिली आहे. आता अपूर्ण पत्त्यामुळे पालिकेच्या रडारवर न आलेल्या व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती विक्रीकर विभागाकडून मिळविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.