शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

सटाण्यात दिल्लीतून पाच जणांची एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:27 IST

सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

ठळक मुद्देशहरात खळबळ : सीमाबंदीचे उल्लंघन केल्याने कारवाईची मागणी

सटाणा : शहरात गुरु वारी (दि.२) रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असताना ते पाच जण आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.शहरातील एका भागात गुरु वारी रात्री अचानक दिल्लीहून पाच जण आले. त्यांच्या नातेवाइकांकडे आलेल्या या पाच जणांनी घरात थांबण्याऐवजी ते बाहेर फिरताना आढळले. लॉकडाउन काळात घरात राहणे बंधनकारक असताना राजरोस बाहेर फिरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले. मात्र डॉ.नायानी यांनी त्यांची तपासणी करून तसे कोणतेही लक्षणे नसल्याचे सांगून सोडून दिले.हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी दिल्लीहून आलेल्या पाच जणांना चौदा दिवस रुग्णालयातच ठेवावे अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याला नकार देत त्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांच्यावरच गुन्हे दाखल करू, असा सज्जड दमच दिला. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत.कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून, या भयंकर आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित मोठ्या प्रमाणावर सापडल्यामुळे अधिकच भीतीचे वातावरण पसरले असताना गुरु वारी (दि. २) रात्री ते पाच जण अचानक दिल्लीहून शहरातील एका भागात अवतरल्याने त्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे. ते पाच जण रात्री फिरत असल्याने स्थानिक नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, त्यांनी रात्र अक्षरश: जागून काढली.देशभर लॉकडाउन केल्यामुळे सरकारने राज्या-राज्यातील, जिल्ह्या-जिल्ह्यातील सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले असताना ग्रामीण भागातदेखील गावागावात प्रवेशाला बंदी घालत एक पाऊल पुढे टाकले. सर्वत्र लॉकडाउनचे काटेकोर पालन केले जात असताना सटाण्यात दिल्लीचे लोक आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस