शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नाशिकरोडला रेल्वेने सव्वा लाख भाविक

By admin | Updated: September 12, 2015 23:51 IST

स्थानक गजबजले : दसक घाट बंदच

नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पर्वणीच्या शाहीस्नानासाठी दोन दिवसांत रेल्वेमार्गे जवळपास सव्वा लाख भाविक शहरात दाखल झाले आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या मुंबईला जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येत असून, सिन्नर फाटा बाजूने भाविकांना पंचवटी, तपोवन, त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दसक घाटावर भाविकांना न सोडण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे.अमावास्येच्या दिवशी असलेल्या दुसऱ्या पर्वणीचे भाविकांमध्ये मोठे महत्त्व असून, या पर्वणीला शाहीस्नान करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून रेल्वेने हजारो भाविक शहरात दाखल झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत शाहीस्नानासाठी जवळपास सव्वा लाख भाविक शहरात दाखल झाले आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत लांब पल्ल्याच्या १०-१२ रेल्वे नाशिकरोडहून मुंबईला जातात. त्यामुळे आणखी हजारो भाविक दाखल होण्याचा रेल्वे प्रशासन व पोलिसांचा अंदाज आहे.दसक घाट बंदचशहर पोलिसांनी दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना दसक घाटावरच स्नानासाठी सोडण्याचा घेतलेला निर्णय रद्द केला आहे. दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे व आगरटाकळी येथील मलशुद्धीकरण केंद्रात खासगी ठेकेदारांच्या कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे दूषित व सांडपाणी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात मिसळले आहे. तसेच रेल्वेमार्गे येणाऱ्या भाविकांना सिन्नर फाटा येथून बसने काठे गल्ली सिग्नल त्रिकोणी गार्डन व पुणे बाजूकडून रस्तामार्गे येणाऱ्या भाविकांना चिंचोली नाका बाह्य बसस्थानक येथून बसने डीजीपीनगर, इंदिरानगरमार्गे मुंबई नाका महामार्ग बसस्थानक येथे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जेलरोड दसक घाटावर स्नानासाठी भाविकांना सोडण्यात येणार नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)