शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जूनच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात १२ टक्के पर्जन्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:29 IST

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे. विशेष म्हणजे समाधानाची बाब म्हणून दुष्काळी ओळखल्या जाणाºया मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यांत तर या पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे.नाशिक जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्काच पाऊस झाला होता. यंदा मात्र हेच प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर मान्सूनच्या आगमनाकडे साºयांचे लक्ष लागून होते. तथापि, गुरुवार व शुक्रवारी पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली आणि नाशिक, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेवर, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांना जोरदार हजेरी लावली.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५ मिलीमीटर पाऊस झाला. जून महिन्याच्या सरासरीच्या १२ टक्के पाऊस नोंदविला गेला. या पावसामुळे मालेगावला ११४, बागलाणला १३८, देवळा १२२, सिन्नरला १२१ टक्के पाऊस झाला आहे. हे सारे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओेळखले गेले आहेत. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदविला गेल्याने. शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.-----------------पावसाचे पाणी सोडून देण्याची वेळशुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यातच दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अशातच नांदूरमधमेश्वर बंधाºयात अगोदरपासूनच १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत जवळपास तीनशेहून अधिक क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले. हे पाणी पुढे नगर जिल्ह्याकडे झेपावले.

टॅग्स :Nashikनाशिक