शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पहिलीच वेळ : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम

By admin | Updated: August 7, 2016 00:31 IST

सर्व धरणांतून विसर्ग

नाशिक : पावसाने जिल्ह्यात शनिवारी हजेरी कायम ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच २३ धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपावेतो ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपावेतो ५६९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तो खरा ठरत रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. परिणामी सूर्यदर्शनदेखील होऊ शकले नाही. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शाळांनी पावसाचा जोर पाहून सुटी जाहीर करून टाकली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून सकाळी १० वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दहा वाजता १२,७०८ क्यूसेक असलेले पाणी व त्यात धरणाच्या खालच्या बाजूने गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांमुळे हाच विसर्ग रामकुंडाजवळ १४,१९० क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने पुन्हा गोदावरीच्या पुराची पातळी वाढली. टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्यात बुडाला. परंतु मंगळवारच्या पुरामुळे अगोदरच सावध असलेल्या गोदाकाठच्या नागरिकांचे शनिवारच्या पुरात नुकसान टळले.धरणांचे दरवाजे उघडलेयंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अपवाद गिरणा धरणाचा असून, ते ३५ टक्केच भरले आहे. २३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के साठा झाला आहे. शनिवारी गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा या १९ धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. दशकात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले.