शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पहिलीच वेळ : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम

By admin | Updated: August 7, 2016 00:31 IST

सर्व धरणांतून विसर्ग

नाशिक : पावसाने जिल्ह्यात शनिवारी हजेरी कायम ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच २३ धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपावेतो ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपावेतो ५६९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तो खरा ठरत रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. परिणामी सूर्यदर्शनदेखील होऊ शकले नाही. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शाळांनी पावसाचा जोर पाहून सुटी जाहीर करून टाकली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून सकाळी १० वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दहा वाजता १२,७०८ क्यूसेक असलेले पाणी व त्यात धरणाच्या खालच्या बाजूने गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांमुळे हाच विसर्ग रामकुंडाजवळ १४,१९० क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने पुन्हा गोदावरीच्या पुराची पातळी वाढली. टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्यात बुडाला. परंतु मंगळवारच्या पुरामुळे अगोदरच सावध असलेल्या गोदाकाठच्या नागरिकांचे शनिवारच्या पुरात नुकसान टळले.धरणांचे दरवाजे उघडलेयंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अपवाद गिरणा धरणाचा असून, ते ३५ टक्केच भरले आहे. २३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के साठा झाला आहे. शनिवारी गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा या १९ धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. दशकात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले.