शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
4
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
5
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
7
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
8
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
9
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
10
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
11
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
12
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
13
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
15
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
16
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
17
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
18
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
19
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
20
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

पहिलीच वेळ : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम

By admin | Updated: August 7, 2016 00:31 IST

सर्व धरणांतून विसर्ग

नाशिक : पावसाने जिल्ह्यात शनिवारी हजेरी कायम ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच २३ धरणांपैकी १९ धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपावेतो ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपावेतो ५६९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने तो खरा ठरत रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. परिणामी सूर्यदर्शनदेखील होऊ शकले नाही. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शाळांनी पावसाचा जोर पाहून सुटी जाहीर करून टाकली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून सकाळी १० वाजेनंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दहा वाजता १२,७०८ क्यूसेक असलेले पाणी व त्यात धरणाच्या खालच्या बाजूने गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांमुळे हाच विसर्ग रामकुंडाजवळ १४,१९० क्यूसेकपर्यंत पोहोचल्याने पुन्हा गोदावरीच्या पुराची पातळी वाढली. टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यानंतर दुपारी रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीही पूर्णपणे पाण्यात बुडाला. परंतु मंगळवारच्या पुरामुळे अगोदरच सावध असलेल्या गोदाकाठच्या नागरिकांचे शनिवारच्या पुरात नुकसान टळले.धरणांचे दरवाजे उघडलेयंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अपवाद गिरणा धरणाचा असून, ते ३५ टक्केच भरले आहे. २३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के साठा झाला आहे. शनिवारी गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर, ठेंगोडा या १९ धरणांमधून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. दशकात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले.