शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

आधी नजरचूक आता फौजदारीचा धाक

By admin | Updated: August 23, 2015 22:46 IST

अजब कारभार : दिंंडोरी तहसीलदार कार्यालयाच्या नोटिसीने शेतकरी भयभीत

वणी : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मिळालेली भरपाईची रक्कम पुन्हा शासकीय खात्यात जमा करण्याची नोटीस तहसीलदारांनी दिली आहे. तसे न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा उल्लेख नोटीसमध्ये असल्याने खळबळ उडाली आहे.माणिक धोंडीराम महाले रा. भातोडे, ता. दिंडोरी यांची चंडिकापूर शिवारात शेतजमीन असून डिसेंबर २०१४ मध्ये गारपिटीमुळे त्यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या सगळ्या द्राविडी प्राणायामाला सामोरे गेल्यानंतर सदर रक्कम नुकसानग्रस्त काढू शकतो. दरम्यान माणिक धोंडीराम महाले याचे बँक आॅफ महाराष्ट्र, वणी शाखा खाते क्र मांक ६००६१५० ५४९२ यामध्ये वीस हजार रुपये ही नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली. गरजेपोटी महाले यांनी ही रक्कम काढून देणेघेणे, उधार उसनवारीची पूर्तता केली. दरम्यान क्र . एम एजी / कावि/१०५९/२०१५ अन्वये माणिक धोंडीराम महाले यांना दि. १२ आॅगस्ट रोजी तहसीलदारांच्या स्वाक्षरी अन्वये नोटीस बजावण्यात आली असून त्यात मौजे भातोडे येथील श्रीमती कमळाबाई हौशीराम चव्हाण यांचे नावासमोर नजरचुकीने आपला बँक आॅफ महाराष्ट्र खाते क्र मांक दर्शविला असून त्यांचेऐवजी आपणास आपल्या उपरोक्त खात्यावर वीस हजारांची रक्कम प्राप्त झाली आहे. ती तत्काळ खात्यात भरणा करावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा उल्लेख त्यात असल्याने या शेतकऱ्याची मानसिक स्थिती दोलायमान झाली असून प्रशासकीय यंत्रणांनी सर्व सोपस्कार पाडल्यानंतर ही नजरचूक झाली कोणाकडून?मग त्या शेतकऱ्याची भरपाईची रक्कम कोठे गेली? फौजदारी गुन्ह्याच्या सूचनेमुळे गर्भगळीत झालेल्या शेतकऱ्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची कोणी? सदर प्रकरण सारवासारव करण्यात प्रशासकीय यंत्रणा पडद्यामागून सूत्रे हलवित असल्याची चर्चा असून या शेतकऱ्याला न्याय द्यायचा कोणी? असा सवाल विचारला जातो आहे. (वार्ताहर)

 

 नुकसानभरपाईची पद्धततलाठय़ाने तहसील कार्यालयाला गारपिटीची माहिती दिली. तहसीलदारांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांना पंचनामा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणेबाबत सूचित केले. या पंचनाम्यात नुकसानीची टक्केवारी, गट नंबर, शेती क्षेत्न , पिकाबाबत वर्णन असा तपशील नमूद करणे अपेक्षित असते, सदर पंचनामे मंडल अधिकार्‍यामार्फत तहसीलदारांकडे जमा करावे लागतात.

 तलाठी, कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीनिशी पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर झाल्यानंतर सदर अहवाल तपासणीअंती जिल्हाधकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. नुकसानभरपाईची शासकीय मदत जाहीर झाल्यानंतर सदर मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा होऊन तालुका पातळीवर नुकसानीने बाधित शेतकर्‍याच्या बँक खात्याचा तपशील मागविण्यात येतो. तद्नंतर त्या खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा होते.