शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार हा राजकीय षडयंत्राचा भाग, इम्तीयाज जलील यांचा दावा

By संजय पाठक | Updated: May 30, 2024 17:11 IST

येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे.

नाशिक- मालेगाव येथील एमआयएमचे माजी महापौर अब्दूल मलीक यांच्यावर चार दिवसांपूर्वी झालेला गोळीबार हा व्यक्तीगत वादातून नव्हे तर राजकीय वादातूनच झाला आहे. मालेगावमधून एमआयएमचे बसलेले बस्तान उखडवण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप खासदार इम्तीयाज जलील यांनी केला आहे. येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे.

मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री गोळीबार झाला होता. त्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याने नाशिकच्या पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पाश्व'भूमीवर इम्तीयाज जलील यांनी आज या रूग्णालयात जाऊन अब्दुल मलीक यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जलील यांनी या प्रकरणाला वेगळी दिशा दिली जात असल्याचा आरोप केला. अब्दूल मलिक आणि त्यांच्या बंधूंनी मालेगाव मध्ये एमआयएमचा प्रचार प्रसार करून अस्तीत्व निर्माण केले. त्यामुळे आमदार महापौरपद मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर एमआयएमचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी हा गोळीबार झाला  असल्याचेही जलील म्हणाले.

मालेगावमधील गोळीबार ही केवळ आताची घटना आहे, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर तर विधानसभेपर्यंत आणखी भयंकर स्थिती होणार आहे. बंदूकीच्या जेारावरच विरोधकांमध्ये भीती निर्माण केली जाईल असे ते म्हणाले.

संभाजी नगरात सर्वात मोठा जल्लोष

लोकसभा निवडणूकीचा ४ जून रोजी निकाल लागणार आहे. हा निकाल काय असेल तो पहायचा असेल तर छत्रपती संभाजी नगर येथे बघा. सर्वात मोठा जल्लोष येथेच होईल असे इम्तीयाज जलील म्हणाले.

टॅग्स :MalegaonमालेगांवImtiaz Jalilइम्तियाज जलील