शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निसुरक्षा : अवघे १५ शिक्षण  संस्थांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:55 IST

शहरातील अग्निसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने दिलेली १५ फेबु्रवारीची डेडलाइन संपली असून, त्या कालावधीत साडेचारशे रुग्णालयांनी प्रस्ताव सादर केले असले तरी शिक्षण संस्थांनी जेमतेम १५ प्रस्ताव सादर केले आहेत.

नाशिक : शहरातील अग्निसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने दिलेली १५ फेबु्रवारीची डेडलाइन संपली असून, त्या कालावधीत साडेचारशे रुग्णालयांनी प्रस्ताव सादर केले असले तरी शिक्षण संस्थांनी जेमतेम १५ प्रस्ताव सादर केले आहेत.  राज्य शासनाने ६ जानेवारी २००८ मध्ये अग्निसुरक्षा कायदा केल्यानंतर महापालिकेने त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात केली आहे. त्यानंतर झालेल्या इमारतींना अग्निशमन सेवा कायद्यानुसार विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यातही ज्या इमारती २००८ नंतर बांधल्या गेल्या आहेत, त्यांनाच या कायद्याच्या अंमलबजावणीची सक्ती करण्यात आली आहे. तथापि, याबाबत कल्पना देऊनही अनेक इमारतींमध्ये अशाप्रकारच्या सुविधा नाहीत. शहरातील हॉस्पिटलसंदर्भात महापालिकेने केलेल्या सक्तीनंतर बराच गाजावाजा झाला; परंतु त्यानंतरही अनेक डॉक्टरांनी अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच कंपाउंडिंग चार्जेसही भरले होते. दहा बेडची रुग्णालये तसेच काही ठरावीक उंच इमारतींना दिलेल्या सवलतीमुळे सुमारे साडेचारशे रुग्णालयांचा प्रश्न मार्गी लागला असून त्यांना ‘ना हरकत दाखले’देखील देण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी काही प्रकरणे प्रलंबित आहेत.  वैद्यकीय व्यावसायिकांना दरवर्षी महापालिकेकडून परवाना नूतनीकरण करावे लागत असल्याने ते प्रशासनाकडे येत असल्याने त्यांना अडवता आले, परंतु शहरातील अनेक व्यापारी संकुले, मिश्र वापराच्या इमारती तसेच शिक्षण संस्था पुन्हा महापालिकेकडे येत नसल्याने अडचण निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गेल्या वर्षाच्या अखेरीस जाहीर सूचना देऊन अशा इमारतींना १५ फेब्रुवारीपर्यंत अग्निसुरक्षा कायद्यान्वये पूर्तता करून तसा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. या मुदतीत जे मिळकतधारक पूर्तता अहवाल सादर करणार नाहीत, त्यांच्या मिळकती कोणत्याही क्षणी सील करण्यात येईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. परंतु त्याला प्रतिसाद म्हणून अवघ्या १५ शिक्षण संस्थांनीच पूर्तता अहवाल करून प्रस्ताव सादर केले आहेत. महापालिकेने दिलेली डेडलाइन संपली असली तरी त्यानंतर मात्र अद्याप कोणतीही विचारणा नसल्याने मिळकतधारकदेखील थंड झाले आहेत.यंत्रणा उभारणे अनिवार्यमहापालिकेने व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांसह विविध मिळकतधारकांना आवाहन केले असले त्यात पंधरा मीटर उंच इमारती असलेल्यांनाच ही यंत्रणा उभारणे अनिवार्य आहे. त्यातच बहुतांशी शाळा इमारती बैठ्या असून, काही इमारती एक ते दोन मजली असल्याने अशा खूप शिक्षण संस्था शहरात नाहीत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. तथापि, शहरात अनेक शाळा या एकाच इमारतीत सदनिकेतदेखील भरतात. त्यांना अग्निसुरक्षा कायदा २००८ लागू होत नसला तरी तेथील अग्निसुरक्षेचे काय हादेखील मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :Schoolशाळा