शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 3, 2016 22:34 IST

आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

 पिंपळगाव बसवंत : सुदैवाने जीवितहानी नाही; तीन तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे आज पहाटे लागलेल्या आगीत ७ दुकाने जळाल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.येथील महामार्गाला लागून असलेल्या बस आगाराजवळ दुकानांनी पहाटे ३.४५ वाजेदरम्यान आग लागली. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका गॅरेजमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमक दलाला संपर्क करून बोलविले. अग्निशमक येईपर्यंत काही क्षणात दुकानातील आतील भागांनी पेट घेतला. या आगीने रौद्र रूप धारण केले. एका अग्निशमकच्या गाडीने आग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नसल्याने ओझर व नाशिक अग्निशमक दलाला कळविण्यात आले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र यात सात दुकानांची पूर्णत: राखरांगोळी झाली. या दुकानालगतच गॅरेज आहेत. आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुकानांची हानी टळली. या आगीत सिकंदर मोहम्मद शेख यांच्या गॅरेजमधील १५ मोटरसायकली, अकील शेख यांच्या गॅरेजमधील २ मोटरसायकल, सोहील शेख नजीर यांच्या दुकानातील क्लज प्लेटा, हमीदभाई रेडिएटरवाले, प्रताप काकडे यांचे जनरल स्टोअर्स, अमित गायकवाड यांचे लॉटरीचे दुकान, जाकीर पिंजारी यांचे बॅटरी दुकान, नहीम पटेल यांचे भंगार दुकान जळून खाक झाले. जवळपास ५० लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शॉर्टसर्किट मुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (वार्ताहर)